मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईत दहीहंडीचा उत्सव उत्साहात (Dahi Handi-2022) साजरा होत असताना राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. भाजप आमदार (BJP MLA) आणि मुंबई भाजप अध्यक्ष (Mumbai BJP President) आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Shiv Sena MLA Aditya Thackeray) यांच्यावर पलटवार केला आहे. हिंदु सणांसोबत भाजप आणि हिंदु सणांना विसरणारी शिवसेना हे जनतेला माहिती पडले आहे. वरळीतील आमदार भाजपच्या मतांवर निवडून आलेत त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, मुंबईकरांचे स्वप्न हे भाजपचं स्वप्न असल्याने त्यासाठी काम होत आहे. संपूर्ण मुंबईत भाजपचं कमळ फुलणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, शिवसेनेने हिंदुत्व (Hindutva) कधीच सोडले आहे. त्यांनी मराठी माणसांचे सण कधीच मागे टाकले. शिवसेनेने गणपती, नवरात्री, दहीहंडी, श्रावण यातील सहभागीता सोडली. त्यामुळे वरळीत जांबोरी मैदानात (Jamboree Ground) दहिहंडी उभारण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. साधा अर्जही केला नाही. शिवसेना विसरली आहे. मात्र जनता हे विसरणार नाही, जनता भाजपसोबत आहे.
महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Govt) निशाणा साधताना शेलार म्हणाले,
आमच्या हिंदु सणांवर आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी निर्बंध घातले.
मंदिरे बंद झाली, गणपतीच्या मुर्तीवर मर्यादा आली.
मात्र, आज सरकार बदललं आणि तरुणाईचा उत्साह, हिंदु सणाचा उत्साह पुन्हा बघायला मिळत आहे.
याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानतो असं शेलार यांनी म्हटलं.
Web Title : – Ashish Shelar | do not teach us wisdom bjp ashish shelar counter attack on shiv sena aditya thackeray
हे देखील वाचा :
Gopichand Padalkar | ‘देवेंद्र फडणवीसांनी बहुजनांसाठी केलेले काम कुणी झाकू शकत नाही’ – गोपीचंद पडळकर