नवी दिल्ली : भारत सरकारने कलम ३७० मुद्द्यावर घेतलेल्या निर्णयाचे जगभरातून स्वागत केले जात आहे. त्यात आता रशिया नेदेखील जम्मू -काश्मीर च्या निर्णयाचे समर्थन केले आहे. रशिया च्या परराष्ट्र मंत्रालयाने समर्थन करत सांगितले कि, भारताने जम्मू -काश्मीर चे दोन भागात विभाजन करून, केंद्रशासित बनवण्याचा घेतलेला निर्णय संविधानाच्या दृष्टीकोनातूनच आहे. जम्मू -काश्मीर मुद्दावर भारताने घेतलेल्या निर्णयामुळे तणाव वाढणार नाही , याची आशा करत आहे.
रशियाच्या परराष्ट मंत्रालयाने सांगितल्या प्रमाणे, आम्हला आशा आहे कि , भारत – पाकिस्तान आपल्या मधील या मतभेदांना राजनीतिक पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करतील. जम्मू – काश्मीर मध्ये घडलेल्या या बदलांना भारत आणि पाकिस्तान कोणत्याही तणावाला उत्तेजन देणार नाहीत.
त्यात पाकिस्ताचा मित्र राष्ट्र असलेल्या चीनने देखील भारत – पाकिस्तान ला या मुद्यावर उत्तर काढत आपापसातील हा वाद मिटवण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तान चे परराष्ट्रमंत्री शाह मुहम्मद कुरेशी यांच्या भेटीनंतर चीन ने हि प्रतिक्रिया दिली. पाकिस्तान चे परराष्ट्रमंत्री शाह मुहम्मद कुरेशी यांनी सल्ला सहमतीसाठी चीन ची भेट घेतली होती. परंतु चीन ने देखील आपले हाथ वर करत सांगितले कि, भारत आणि पाकिस्तान च्या मुद्यावर आम्ही वाद मिटण्याची आशा करतो. तसेच संयुक्त रूपाने शांतता आणि स्थिरता कायम ठेवण्याचे आव्हाहन करतो.
भारताने पाकिस्तान ला जम्मू- काश्मीर च्या निर्णयाला स्वीकारायला हवे, तसेच भारताच्या आपसातील मुद्यावर भाष्य करण्यास बंद केले पाहिजे , अशी चेतावणी दिली. परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानला धारेवर धरले आहे, पाकिस्तान का जम्मू -काश्मीर च्या निर्णयामुळे चिंता सतावत आहे कि , आता ते काश्मीर मधील लोकांना दुर्लक्षित करून दहशतवादासाठी प्रेरित करू शकणार नाही.