इंदोर वृत्तसंस्था : “जम्मू – काश्मीर चे कलम ३७० हटविल्यानंतर आता नजर पाकव्याप्त काश्मीरवर ” असं मोठं वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. कलम ३७० हटविल्यानं पाकिस्तानची “पळता भुई थोडी” झाली आहे. या भीतीनचं त्यांनी भारताबरोबरचे संपूर्ण व्यापारी संबंध , राजकीय संबंध तोडले आहेत. पाकव्याप्त काश्मीर हा देखील भारताचाच भाग आहे, जम्मू – काश्मीर राज्याचा तो भाग असल्याने तो भारताला जोडणं आमचं काम आहे, असं प्रकाश जावडेकर यांनी म्हंटले आहे.
इंदोरमधील भाजप कार्यलयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असल्याने तेथील विधानसभेच्या जागा रिक्त ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता पाकव्याप्त काश्मीर च्या दिशेने केंद्र सरकार पावले उचलणार आहेत. मागच्या आठवड्यात भारत सरकारने दोन्ही सभागृहात कलम ३७० आणि जम्मू -काश्मीर च्या पुनर्रचनेचे विधायक मांडण्यात आले. राष्ट्रपतींच्या सहीने त्याला मंजुरी देखील मिळाली. यांनतर काश्मीर मध्ये सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त जवानांच्या तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. सध्या राज्यभरात कलम १४४ लागू आहे.
अमित शहा यांनी देखील प्रस्ताव सादर करताना जम्मू- काश्मीर राज्याच्या उल्लेख करताना पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनचा देखील समावेश असतो. याबाबत संसदेला अधिकार आहे. त्यासाठी कोणाच्याही संमतीची गरज नाही. पाकव्याप्त काश्मीरसाठी आम्ही जीव देण्यासाठी तयार आहोत.असेही ते म्हणाले . तसेच पंडित नेहरू यांनी कलम ३७० हा अमर्यादित काळासाठी असल्याचे सांगितले होते , परंतु तो हटविण्यास ७२ वर्षे लागली. ज्यामुळे काश्मीरला भारतापासून लांब राहावे लागले,असा आरोपही त्यांनी केला.
देश के बाकि राज्यों की तरह आरक्षण का लाभ #JammuKashmir के लोगों को नहीं मिला, इसकी वजह है #Article370 ।@AmitShah @JPNadda @BJP4India @BJP4MP @BJP4JnK pic.twitter.com/qS4LdE9Igg
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) August 12, 2019