बहुजननामा ऑनलाईन टीम – भारत सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान सध्या हडबडला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याबाबत आम्ही संयुक्त राष्ट्र संघात तक्रार करू असा इशारा दिला होता. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रश्न मांडायचा पर्यंत चालू आहे. तर आता भारत ही पाकिस्तानच्या या हालचालींना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे.
पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी भारताने रणनीती आखली आहे. ‘ भारत सध्या याप्रकरणी संयुक्त राष्ट्र संघाच्या पाच स्थायी आणि दहा अस्थायी सदस्यांसोबत सध्या चर्चा करत आहे. यामध्ये भारताने त्यांना जम्मू काश्मिरातील कलम ३७० का हटवले याबद्दल माहिती दिली. या चर्चेद्वारे हे समजवून सांगण्यात येत आहे की, कलम ३७० हटवल्याने जम्मू काश्मिरातील लोकांना नेमके काय फायदा होणार आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मिरात पाकिस्तान वारंवार करत असलेल्या कुरापतींकडे संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांचे लक्ष वेधण्याचे भारताचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. अशा आशयाचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
पाकिस्तानने भारताच्या निर्णयाविरोधात सगळ्यात आधी मलेशिया आणि तुर्की या देशांकडे मदत मागितली होती. तर कलाम ३७० रद्द केल्याच्या मुद्यावरून UAE ने थेट भारताचीच बाजू घेतली आहे. मलेशियन या मुद्यावर आमची नजर असेल असे आश्वासन दिले आहे. तर तुर्कीनेही केवळ लवकरच मदत करू अशा प्रकारचे आश्वासन केले. सध्या सगळीकडूनच पाकिस्तानची निराशा झाली आहे.