बहुजननामा ऑनलाईन – आम्हीही भारतीयच आहोत, मात्र कलम ३५ अ व ३७० हटवता कामा नये. कारण या कलमांवरच आमचा पाय टिकलेला आहे. हे कलम आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे हे कलमं हटवण्याची गरज नाही असे वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केले.
दरम्यान मध्य काश्मीरमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काश्मीर घाटीत तैनातीसाठी पाठवण्यात आलेल्या १० हजार जवनासंदर्भात प्रश्न निर्माण कऱण्यात आला आहे. तसेच राज्यात एवढे सैन्य पाठवण्यात येऊनही दहशतीचे वातावरण कमी झाले नाही. असे ते म्हणाले.
दरम्यान राज्यात सध्या शांतातेच वातावरण आहे. तसेच एवढं सैन्य पाठवूनही दहशत आहे म्हटल्यावर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि अशातच जर कलम ३५ हटवले जात असेल तर घटनेच्या सगळ्याच कलमांना हटवावे लागेल आणि १९४७ च्या काळात जावे लागेल असेही त्यांनी सांगितले.