नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याचे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे. त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये १५ ते २० दहशतवादी कॅम्प असतील, असा दावाही केला आहे. या दहशतवादी कॅम्पमध्ये २५० पासून ३५० पेक्षा अधिक दहशतवादी असू शकतात. हे एक मूल्यांकन असून यापेक्षा जास्त संख्या असू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्सने त्यांच्यावर दबाव टाकला तर त्यांना त्यांच्या विधानावर आणि दहशतवादी कारवायांचा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले. तसेच ‘खोऱ्यात मागच्या काही दिवसांमध्ये दहशतवादी कारवाया कमी झाल्या असून त्याचं एक मोठं कारण एफएटीएफही असू शकते,’ असे नरवणे म्हणाले आहेत.
चीनही नाही करू शकत मदत
फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्सद्वारे पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकायची शक्यता असून ‘चीनलाही या गोष्टीबाबत जाणीव झाली आहे की, ते आपल्या सर्वात खास मित्राला प्रत्येकवेळी आणि नेहमीच मदत करू शकत नाहीत,’ असे लष्कर प्रमुख म्हणाले.
नरवणे म्हणाले की, आमच्याकडे पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्याबद्दल सर्व माहिती आहे. पण आम्हाला हे सांगायचे आहे की, आम्ही पाकिस्तानी बॅट कारवाई करण्यात सक्षम आहोत. पाकिस्तानातील दहशतवाद्यांमुळे, एफएटीएफने प्रथम पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याचा विचार केला होता पण नंतर त्याला काही काळ संधी दिली.