जालना : बहुजननामा ऑनलाईन – राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आम्हाला बरेच दिवस गाफील ठेवून दवणेसोबत मनोमिलन केले. त्यामुळे आम्हाला सर्व मतदारसंघात जाता आले नाही. मात्र रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी आमचा पक्ष सक्षम आहे.असा आमचा निर्धार आहे.वेळप्रसंगी सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ असे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी जालन्यात सांगितले.
आमदार बच्चू कडू हे आपल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. येत्या २८ ताऱखील आम्ही बैठक घेऊन योग्य निर्णय घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वक्तव्यावरून मी दानवे यांच्याविरोधात लढण्याचा निर्धार केला.माझ्या विजयापेक्षा त्यांचा पराभव महत्त्वाचा आहे. राजकारण मतांच्या संख्येने होत असते. त्यामुळे मी उभा राहूनही दानवे निवडून आल्यास वेगळा संदेश जाईल असेही कडू यांनी सांगितले. काँग्रेस कडून कल्याण काळे तर भाजप- सेनेकडून दानवेंची उमेदवारी दिली असता. बच्चू कडूचे दानवें समोर कडवे आवाहन आहे.