मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभेच्या तोंडावर राजकीय नेते मंडळी एकमेकांवर टोकाचे आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात त्यातच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकारने अल्पसंख्याकांकरिता मदरशांचे आधुनिकीकरण तसेच शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात सत्तेत असणारे फडणवीस हे केंद्र सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत करतात परंतु या निर्णयाचे त्यांनी अजूनपर्यंत स्वागत का केले नाही, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारला जर खरंच मुस्लीम समाजाच्या प्रगतीची चिंता असेल तर गेल्या पाचवर्षांपासून मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा सरकारने वारंवार का ? टाळला आहे तसेच यासाठी आरक्षण लागू करण्याचे आदेश या सरकारने द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी २०१३ साली महाआघाडीच्या काळात सरकारने मदरशांच्या आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला होता. यात मदरशांच्या इमारतींचे नूतनीकरण, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयासाठी अनुदान देण्यात आले होते. परंतु या निर्णयाला देवेंद्र फडणवीस यांनी विरोध करीत धार्मिक संस्थांना अनुदान देणे हे असंविधानिक असल्याचा म्हंटले होते.