नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीत पुन्हा हिंसाचार उसळला आहे. येथील सीलमपूर भागात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली असून डीटीसीच्या तीन बस फोडल्याची घटना घडली. त्यामुळे या ठिकाणी मोठी हिंसाचाराची परिस्थिती तयार झाल्याचे आढळून आले.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सीलमपूरहून आंदोलकांचा मार्च सुरू झाला. त्यानंतर जाफराबादमध्ये मार्च पोहोचल्यानंतर हिंसाचार उसळल्याचे समजते. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जमखी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH Delhi: Police take away protesters from the spot where a clash broke out between police and protesters, during protest against #CitizenshipAmendmentAct today. Police has also used tear gas shells to disperse the protesters. pic.twitter.com/DkPGAEQ1tM
— ANI (@ANI) December 17, 2019
आंदोलन कर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे आणि हिसंक वळण लागल्यामुळे दिल्लीतील पाच मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली. वेलकम, जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, सीलमपूर आणि गोकुलपूर ही मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत.
Delhi: Police use a drone to monitor the situation in Jafrabad area where a clash broke out between police and protesters, during protest against #CitizenshipAmendmentAct today. https://t.co/8wVpBiCMVa pic.twitter.com/brkTJdDZIz
— ANI (@ANI) December 17, 2019
Delhi: Police use tear gas shells to disperse the protesters after a clash broke out between police and protesters in Jafrabad area, during protest against #CitizenshipAmendmentAct. Protesters also pelted stones during the protest. Two buses have been vandalised. pic.twitter.com/pbxBiARo3Q
— ANI (@ANI) December 17, 2019
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात हिंसाचार उसळला होता. या प्रकरणी पोलिसांनी आज दहा जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक केलेल्या व्यक्तींमध्ये एकही विद्यार्थी नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, अटक केलेल्या १० लोकांपैकी ३ जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Delhi: Police use tear gas shells to disperse the protesters after a clash broke out between police and protesters in Jafrabad area, during protest against #CitizenshipAmendmentAct. Protesters also pelted stones during the protest. Two buses have been vandalised. pic.twitter.com/pbxBiARo3Q
— ANI (@ANI) December 17, 2019
ईशान्येकडे परिस्थिती नियंत्रणात येत आहे. आसामधील कर्फ्यू देखील उठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १३६ जणांवर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच १९० आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध संघटनेच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
Delhi Metro Rail Corporation (DMRC): Entry & exit gates of Welcome, Jaffrabad and Maujpur-Babarpur, Seelampur and Gokulpuri are closed. Trains won't be halting at these stations.
A clash broke out b/w police&protesters in Jafrabad, during protest against #CitizenshipAmendmentAct pic.twitter.com/FagxaMGaZJ
— ANI (@ANI) December 17, 2019
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतातील राज्यांत सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण देशभरात पसरले असून, त्यात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात कँटिन, वाचनालय व वर्गात शिरून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हैदराबाद, तामिळनाडू, लखनऊ, बंगळुरू, चेन्नई, मुंबई येथील विद्यार्थ्यांनी काल जोरदार निदर्शने करण्यात आली. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या कायद्याविरोधात कोलकातामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. नागरी सुधारणा कायद्यविरोधात देशभर आंदोलने सुरु आहेत. प्रत्येक स्तरांवरून याबाबत निषेध व्यक्त केला जात आहे.
Visit : bahujannama.com