बहुजननामा ऑनलाईन टीम – मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राज्य सरकारची वसुली आधी 100 कोटींची होती. आता ही वसुली 300 कोटीवर गेल्याचा आरोप करत देशपांडे यांनी अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आरटीओतील एका निलंबित अधिकाऱ्याने परिवहन विभागात महावसुली सुरू असल्याची तक्रार नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मनसेने याच मुद्द्यावरुन परब यांना लक्ष्य केले आहे.
१०० कोटी महावसूली आता ३०० कोटीवर ? परिवहन मंत्री परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांची नाशिक पंचवटी पोलिस स्टेशनात तक्रार, गृहमंत्री वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 29, 2021
संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. यावरून देशपांडे यांनी ट्विट करुन काही सवाल उपस्थित केले आहेत. 100 कोटींची वसुली आता 300 कोटींवर पोहोचली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांनी नाशिक पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का? असा सवाल देशपांडेंनी Sandeep Deshpande उपस्थित केला आहे. दरम्यान नाशिकमध्ये आरटीओचे निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागाच्या महावसुली विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत. त्यानुसार गजेंद्र पाटील यांना चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.