मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध (Andheri By-Election) करण्यासाठी केलेल्या आवाहनानंतर अनेक घडामोडी घडल्या आणि आज भाजपने निवडणुकीतून (Andheri By-Election) माघार घेतल्याचे जाहीर केले. यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काँग्रेसने देखील या घडामोडींवर संशय व्यक्त केला आहे. आता तर भाजपाच्या माघार घेण्यावर शिवसेना सुद्धा संशय व्यक्त करत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut), उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (MP Priyanka Chaturvedi) यांनीही भाजपाच्या माघार घेण्याच्या कृतीवर …ही फिक्स मॅच, असे म्हणत टीका केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले की, ऋतुजा लटकेंवर भ्रष्टाचाराचा आरोप करताना भाजपाची संवेदनशीलता कुठे होती? भाजपाला महाराष्ट्राच्या संस्कृतीची आता आठवण आली असेल, तर त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. ‘देर आये दुरुस्त आये’. खरं तर पराभवाच्या नामुष्कीतून वाचण्यासाठीच भाजपने माघार घेतली आहे. उच्च न्यायालयातील (High Court) विजयानंतर हा आमचा दुसरा विजय आहे. आगामी सर्व निवडणुकीत आम्ही मोठ्या बहुमताने जिंकू.
दरम्यान, भाजपाच्या माघार घेण्याच्या निर्णयानंतर एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. निवडणूक (Andheri By-Election)
बिनविरोध करण्यासंदर्भात आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक
वारसा दाखविला आहे. यासाठी शिवसेना सदैव पवारांची आभारी राहील, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे शिवसेना नेते हे राज ठाकरे यांच्या पत्राला भाजपाचे स्क्रीप्ट, फिक्स मॅच असे म्हणत टीका करत आहेत.
Web Title :- Andheri By-Election | shivsena mp priyanka chaturvedi commented on bjp after bjp candidate murji patel withdraws from andheri east byelection
हे देखील वाचा :
Pune Crime | कोंढव्यात 9 लाखांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा गुन्हे शाखेकडून जप्त