मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 59 चिनी अॅप्स बॅन केले आहेत. भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये सोशल मीडियावर हा विषय चर्चेत असताना काल चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ च्या वृत्तपत्राचे संपादक हू शिजिन यांनी भारतीयांना टोमणा मारला. त्यावर सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणार्या महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्र यांनी शानदार उत्तर दिले आहे.
चीनच्या लोकांनी भारतीय वस्तूंना बॅन करायचे ठरवले तरी ते करु शकत नाहीत, कारण इकडे भारतीय वस्तू खूप कमी आहेत अशा आशयाचे ट्विट हू शिजिन यांनी ट्विटर अकाउंटवरुन केले होते. भारतीय मित्रांनो तुमच्याकडे राष्ट्रवादापेक्षा महत्त्वाचे काहीतरी असायला हवे असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले होते. भारतीयांना चिथवणार्या या ट्विटवर आनंद महिंद्रांचे लक्ष गेले.
https://twitter.com/anandmahindra/status/1277939258322370560
त्यानंतर त्यांनी शिजिन यांच्या त्या ट्विटला रिट्विट करत प्रत्युत्तर दिले. ही टिप्पणी कदाचित भारतीय कंपन्यांसाठी सर्वात प्रभावी आणि प्रेरक असेल चिथवल्याबद्दल आभार असे म्हणत महिंद्रा यांनी, तुमचे चॅलेंज स्वीकारले अशा आशयाचे ट्विट केले आहे. आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट भारतीय नेटकर्यांच्या चांगलंच पसंतीस उतरले असून 66 हजारांहून अधिक जणांनी ते आतापर्यंत लाइक केले आहे. त्यावर नेटकरी आपल्या विविध प्रतिक्रियाही देत आहेत.