नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाल्याने इराण सूडबुद्धीने पेटला असून त्यानंतर संपूर्ण जगातच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका युद्धाची तयारी जोरात करत असताना इराकने इराकस्थित अमेरिकी सैन्यावर निशाणा साधत अनेक क्षेपणास्त्रे उडवली आहेत. यामुळे इराणकडून युद्धाची सुरुवात आहे, असे मानले जात आहे. मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या उपस्थितीविषयी परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञांचे असे मत आहे की, अमेरिकेची इथली उपस्थिती फक्त त्यांच्या वैयक्तिक गोष्टी पूर्ण करण्यासाठी आहे. त्यांच्या या वैयक्तिक गोष्टी तेव्हाच पूर्ण होतील, जेव्हा अमेरिकेच्या इच्छेनुसार तिथे सरकार स्थापन होईल.
इराकमध्ये सद्दाम हुसैन याचा पाडाव झाल्यानंतर अमेरिकेच्या संरक्षणाखाली त्यांच्या आवडीचे सरकार आले, पण इतर ठिकाणी तसे झाले नाही. तज्ज्ञांच्या माहितीनुसार अमेरिकेला इराणमध्येही आपल्या आवडीचे सरकार ठेऊ इच्छिते, जे त्यांच्या हितासाठी काम करेल. पण इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खमेनेई यांच्या उपस्थितीत हे शक्य नाही. कधीकाळी इराणमध्येही अमेरिकेच्या आवडीचे सरकार होते. परंतु इराण आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेले वैर हे एका भारतीयामुळे झाले आहे. या नियमांना एका भारतीयाने आव्हान दिले होते, ज्याचे नाव अयातुल्लाह रुहोल्लाह खामेनेई अयातुल्लाह होते.
खामेनेई यांचे आजोबा सय्यद अहमद मसूवी हे उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे राहणारे होते. १८३० मध्ये ते अवधच्या नवाबासोबत धार्मिक भेटीसाठी इराक आणि इराणला गेले होते. त्यानंतर तेथून परत यायचे त्यांचे मन झाले नाही. आणि ते तेथीलच खामेनेई गावात स्थायिक झाले. डाईचे वेले यांच्यानुसार त्यांच्या नंतरच्या पिढीला आपल्या आडनावाप्रमाणे वापरले, जे नाव आज इराणमधील सर्वात शक्तिशाली व्यक्तीशी संबंधित आहे. इराणची क्रांती होण्याअगोदर इराणच्या शाहच्या हुकुमताखाली खामेनेई यांना भारतीय मुल्ला आणि एजेंट देखील म्हटले जायचे. त्यांना गझल ऐकण्याची आवड होती. एका लेखामध्ये अयातुल्लाह यांना खूप वाईट बोलले गेले होते. पण शाह यांचा दावा खोटा ठरला आणि जनता त्यांच्याच विरोधात रस्त्यावर उतरली होती.
भारत सरकारच्या विमान कंपन्यांनी अमेरिका-इराणमधील तणावामुळे इराकला जाऊ नये, असा सल्ला दिला आहे.