बहुजननामा ऑनलाईन – आज सकाळी भुकंपाच्या तीव्र झटकेने संपूर्ण आसाम सहीत ईशान्य भारत हादरला आहे़. अर्ध्या तासात आसाममध्ये ५ भुकंपाचे धक्के जाणविले असून लोक घराबाहेर आले. काल दुपारी १२.४२ पासून आसाममधील सोनीतपूर येथे भुकंपाचे धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. पहिला धक्का काल दुपारी १२.४२ वाजता बसला़ त्याची तीव्रता २.६ रिश्टर स्केल होती. त्यानंतर रिश्टर स्केलवर ६.४ तीव्रतेचा सर्वात मोठा धक्का सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी बसला. त्याचा केंद्रबिंदू १७ किमी खोल होता. त्यानंतर ८ वाजून १३ मिनिटांनी ४ रिश्टर स्केलचा धक्का बसला. त्यानंतर पाठोपाठ ८ वाजून २५ मिनिटांनी ३.६ रिश्टर स्केलचा आणि त्यानंतर ८ वाजून ४४ मिनिटांनी ३.६ रिश्टर स्केलचा धक्का बसला आहे. या धक्क्याचा केंद्रबिंदू २० किमी खोल होता.
आसाममधील सोनीतपूर येथे या भुकंपाचे केंद्रबिंदू असून त्याचे धक्के संपूर्ण ईशान्य भागात जाणवले़ पश्चिम बंगालमध्येही अनेक ठिकाणी भुकंपाचे धक्के जाणवले.
आज सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी ६.४ रेश्टिर स्केलचा धक्का जाणवला. यामुळे आसाममधील अनेक शहरांमधील इमारतींच्या काचा फुटल्या. काही ठिकाणी इमारतींना चिरा पडल्याचे दिसून आले आहे. मात्र, अजूनपर्यंत तरी कोणत्याही जिवित हानीचे वृत्त नाही.
एका पाठोपाठ बसलेल्या भुकंपाच्या धक्काने संपूर्ण आसामसह ईशान्य भारत हदरला असून लोकांमध्ये घबराट पसरली आहे. बहुसंख्य लोकांनी घराबाहेर थांबणे पसंत केले आहे.
आसाममधील भुकंपाच्या अगोदर काल लडाखमध्येही भुकंपाचा झटका बसला. लडाखमध्ये काल सकाळी १० वाजून ४७ मिनिटांनी ४.५ रेश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसला. त्यानंतर सोनीतपला काल दुपारी पहिला भुकंपाचा धक्का बसला. त्याच्या पाठोपाठ हरियानातील रोहतक येथे सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी ३ रेश्टिर स्केलचा भुकंपाचा धक्का बसला. त्याचा केंद्रबिंदू १० किमी खोल होती.