मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेनं सत्तेवर येतात तातडीने मुंबईतील आरे कारशेडच्या उभारणीला स्थगिती दिली. सत्तेवर येण्याआधीपासूनच शिवसेना आरेच्या जंगलातील वृक्षतोडीच्या विरुद्ध होती त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मात्र, आता औरंगाबादमधील एका वृक्षतोडीचा संदर्भ देत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना कमिशन घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच एक राजकीय केल्यानं सध्या त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे.
‘वृक्षतोड ही तुमच्या सोयीनुसार स्वीकरली जाते किंवा जेव्हा तुम्हाला कमिशन मिळते तेव्हा ती वृक्षतोड तुम्हाला मान्य असते. हे अक्षम्य पाप आहे. ढोंगीपणा हा रोग आहे. लवकर बरे व्हा, असा टोलाही अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राचं कात्रणांचा संदर्भ देत, अमृता यांनी शिवसेनेवर कमिशन घेतल्याचा आरोप केला आहे. ज्यात औरंगाबादमध्ये एक हजार झाडं कापली जावीत, अशी शिवसेनेची इच्छा असल्याचं सांगण्यात आलंय.
‘Hypocrisy is a disease ! Get well soon @ShivSena ‘ ! Tree cutting – at ur convenience or allowing tree cutting only when you earn commission – unpardonable sins !! pic.twitter.com/7f68PWPIbA
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 8, 2019
मात्र, शिवसेनेच्या महापौर प्रियांका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटला प्रतिउत्तर दिल आहे. ‘सॉरी, तुमचा अपेक्षाभंग झाला. पण एकही झाड कापलं जाणार नाही, हे सत्य आहे. महापौरांनीही याला दुजोरा दिला आहे. रेटून खोटं बोलणं हा मोठा रोग आहे. गेट वेल सून.’
https://twitter.com/priyankac19/status/1203617466292805632
काय आहे प्रकरण ?
औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. औरंगाबाद शहरात प्रियदर्शनी पार्कमध्ये महापालिकेच्या वतीनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एक हजार झाडं तोडण्याची तयारी करण्यात आली असल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिल होत.