मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात वर्धा येथील हिंगणघाट आणि औरंगाबाद येथे महिलांवर झालेल्या दुर्दैवी घटनांवर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपला राग व्यक्त केला आहे. याबाबत ट्विट करुण त्यांनी अशा प्रकरणांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना कठोर पावलं उचलण्याचे आवाहन केले आहे. आपल्यातील भांडणं विसरून कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे असे अमृता फडणवीस यांनी ट्विट करून म्हंटले आहे.
महाराष्ट्रात गेल्या २ महिन्यात ४ acid attack च्य दुर्देवी घटना घडलेल्या अहेत!नागपुर मधे हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्रोफेसर अंकिता ला जाळण्याचा प्रयत्न,औरंगाबाद मधील बलात्काराचे प्रकरण-ऐकून त्रास होतो!आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षितते विषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक @OfficeofUT
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 6, 2020
अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात चार अॅसिड हल्ल्याच्या दुर्देवी घटना घडल्या आहेत. हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न, औरंगाबादमधील बलात्काराचे प्रकरण ऐकून त्रास होतो! आपल्यातील भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक”. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग केलं आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ ह्या ‘acid attack victors’ सठी असलेल्या योजनेतील सवलती अंकिता ला देण्यात याव्या अणि महिला आयोग अध्यक्षाचे पद लवकर भारण्यात यावे- माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जामिनीवर येऊन पूर्ण करा @OfficeofUT
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 6, 2020
तसेच त्यांनी आपल्या पुढच्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की ‘देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ ह्या ‘acid attack victors’ सठी असलेल्या योजनेतील सवलती अंकिता ला देण्यात याव्या अणि महिला आयोग अध्यक्षाचे पद लवकर भारण्यात यावे- माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जामिनीवर येऊन पूर्ण करा’ अशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.