नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून दिल्लीत सहाव्या टप्प्यात सातही जागांसाठी मतदान होणार आहे. त्यातच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेत आल्यास अमित शाह हे देशाचे गृहमंत्री असतील, असे भाकीत आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे देश चालवतात अशी टीका विरोधकांकडून नेहमी होत असते त्यातच केजरीवाल यांनी या जोडीवर हल्लबोल केला आहे ज्या देशाचा गृहमंत्री अमित शाहसारखा व्यक्ती असेल, त्या देशाची परिस्थिती काय होईल, याचा विचार करुन जनतेने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आपल्या अधीकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले कि ,देशातील नागरिकांनी मतदान करताना फक्त इतकाच विचार करावा की नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर अमित शाहसारखी व्यक्ती गृहमंत्रीपदी विराजमान होईल आणि ज्या देशाचा गृहमंत्री अमित शाहसारखा व्यक्ती असेल त्या देशाची परिस्थिती काय असेल.
दरम्यान, दिल्लीत भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असून, दिल्लीत आघाडी करावी म्हणून आम आदमी पार्टीने काँग्रेसपुढे प्रस्ताव ठेवला होता, पण काँग्रेसकडून त्यास नकार देण्यात आला होता.