नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अनुच्छेद ३७० सह काँग्रेस वर निशाणा साधला. ते म्हणाले की काश्मीरबद्दल अनेक गैरसमज होते. लोकांना इतिहासाविषयी योग्य माहिती दिली जात नव्हती, परंतु आता देशाचा खरा इतिहास लिहिण्याची वेळ आली आहे. अमित शाह म्हणाले की , ‘काश्मीरबद्दल ज्यांनी चुका केल्या होत्या त्यांनी इतिहास आणि सत्यता लपवून ठेवली. याच कारणामुळे कलम ३७० आणि कश्मीरविषयी अनेक अफवा पसरवल्या जात होत्या मात्र आता त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. १९४७ मध्ये काश्मीर हा चर्चेचा आणि विवादाचा विषय होता परंतु इतिहास लोकांसमोर विकृत पद्धतीने मांडला गेला.’
Home Minister Amit Shah: Even today there are many rumours doing rounds about Article 370 and Kashmir. It is important to clarify them. We know since 1947 Kashmir has been a matter of discussion and controversy but distorted history was presented before people. (1/2) pic.twitter.com/bI8MssoJOp
— ANI (@ANI) September 29, 2019
काश्मीरच्या विलीनीकरणासाठी करावी लागली २०१९ पर्यंत प्रतीक्षा
अमित शहा म्हणाले की , ‘ स्वातंत्र्याच्या वेळी ६३० संस्थाने भारतामध्ये विलीन करण्यासाठी कोणतीही अडचण आली नाही परंतु जम्मू-काश्मीरचे विलीनीकरण करण्यासाठी ५ ऑगस्ट २०१९ पर्यंत थांबावे लागले. गृहमंत्री म्हणाले की जेव्हा एखादा देश स्वतंत्र असतो तेव्हा सुरक्षा , संविधान बनवणे यांसारखे अनेक प्रश्न निर्माण होत असतात. ‘
काश्मिरी पंडित आणि सूफी संतांचा संदर्भ
काश्मिरी पंडित आणि सूफी संतांचा संदर्भ देताना गृहमंत्री म्हणाले की , कलम ३७० मुळे काश्मीरला त्रास झाला आहे. काश्मीरमध्ये सूफी संतांची संस्कृती नष्ट होत आहे. काश्मिरी पंडितांना या भागातून हाकलून दिले जात होते. तेव्हा हे मानवाधिकार चॅम्पियन कुठे होते ?
Home Minister Amit Shah in Delhi: Culture of Sufi saints in Kashmir was destroyed, where were these champions of human rights then? Where were they when Kashmiri Pandits were driven out of the region? Kashmir has suffered because of article 370. pic.twitter.com/dgIPX39quL
— ANI (@ANI) September 29, 2019
अमित शहा म्हणाले, ‘जे लोक आमच्यावर आरोप करतात त्यांना मी हे सांगू इच्छितो की जेव्हापासून आमचा राजकीय पक्ष स्थापन झाला तेव्हापासून हीच आमची भूमिका आहे. आमचा असा विश्वास आहे की जेव्हा कलम ३७० होते तेव्हा ते देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी चांगले नव्हते.
Visit : bahujannama.com