मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात वातावरण तापलेले आहे. दिल्लीसह ईशान्यकडील राज्यांमध्ये हिंसाचार देखील उफाळला आहे. दिल्लीतील आंदोलनाप्रसंगी जामिया मिलिया विद्यापीठात घुसून पोलिसांनी विध्यार्थ्यांना बेदम मारहाण करत तोडफोड केली होती. याचे तीव्र पडसाद सगळीकडे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरादार टीका केली आहे. अमित शाह हे जनरल डायरपेक्षा कमी नाहीत, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
ज्या पद्धतीने जनरल डायरने जालियनावला बागमध्ये नागरिकांवर गोळीबार केला होता, त्याचप्रमाणे अमित शाह हे देशातील नागरिकांवर गोळीबार करत आहेत. अमित शाह हे जनरल डायरपेक्षा कमी नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे काही म्हटलेलं आहे ते सर्व योग्यच आहे. असं आमदार मलिक यांनी म्हटलं आहे.
Nawab Malik, NCP: The way General Dyer fired at the people in Jallianwala Bagh, Amit Shah is firing at citizens of the country in the same way. Amit Shah is no less than Dyer. What Uddhav ji said ("What happened at Jamia Millia Islamia, is like Jallianwala Bagh") is correct. pic.twitter.com/2F8o6wMoFE
— ANI (@ANI) December 18, 2019
दिल्लीत जे काही झालं ते जालियनवाला बागची आठवण करुन देणारं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. “देशात अशांतता आणि अस्वस्थततेचं वातावरण निर्माण केलं जात आहे. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. दिल्लीत विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. जणू काही जालियनवाला बागेतले दिवस परत आले की काय ? जालियनवाला बाग झाला तेव्हा ज्याप्रमाणे हिंसाचार घडला होता, तसंच वातावरण देशात पुन्हा निर्माण केलं जात आहे की काय ? अशी भीती देशात आणि तरुणांच्या मनात आहे,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमधील जामिया विद्यापीठात घडलेल्या प्रकारावर भाष्य करत, जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना केली होती.
Visit : bahujannama.com