जबलपूर : वृत्तसंस्था – भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसचे राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये बोलताना अमित शहा यांनी राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांची भाषा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासारखी असल्याचे म्हटले आहे.
#WATCH Union Home Minister & BJP National President Amit Shah in Jabalpur: Mujhe ye malum nahi padta ki Rahul Gandhi, Mamata Banerjee, Arvind Kejriwal aur Imran Khan sabki bhasha ek samaan kyun ho gayi hain. Jabalpur ki janta ko sochna hain ki kyun ek samaan hai. pic.twitter.com/KgGZpmzRTk
— ANI (@ANI) January 12, 2020
शहांनी काँग्रेसचा समाचार घेत ‘आज काँग्रेसचे नेते देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू शरणार्थींना स्वीकारा, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. मात्र राहुल गांधी आणि काँग्रेसला महात्मा गांधींचा विसर पडला आहे,’ अशा कडक शब्दात राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
Union Home Minister & BJP National President Amit Shah at a public meeting in Jabalpur: Bharat par jitna adhikaar mera aur apka hai, utna hi adhikaar Pakistan se aaye hue Hindu, Sikh, Buddhist, Christian sharanarthi ka hai. #CitizenshipAmenmentAct pic.twitter.com/Wc367ogXtj
— ANI (@ANI) January 12, 2020
तसेच काँग्रेस पक्ष, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्र येऊन देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही शहांनी केला. नागरिकत्व कायद्यात कोणाचेही नागरिकत्व काढून घेणार नसल्याचे सांगत या कायद्याद्वारे नागरिकत्व दिले जाणार असल्याचे शहा यांनी सांगितले.
नागरिकत्व दिले जाणार असल्याचे शहांनी सांगितले. तसेच सुधारित नागरिकत्व कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद असेल तर ती राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांनी शोधून दाखवावी, असे आव्हानही शहा यांनी दिले.