बहुजननामा ऑनलाइन टीम : सध्या राज्यात राजकीय स्थिती बदलली असल्याचे चित्र दिसत आहे. या स्थितीनंतर अनपेक्षीतपणे सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील संघटन मजबूत करण्यात लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्र्यांची विविध जिल्ह्यांच्या संपर्कमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याचनुसार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे अहमदनगर व नाशिकचे संपर्कमंत्रीपद दिले आहे. त्याचबरोबर लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त परभणी, जालना आणि बिडच्या संपर्कमंत्रीपद माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे देण्यात आले आहे. त्याचबरोबर अकोल, वाशीम संपर्कमंत्रीपद, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली, यवतमाळ आणि रायगडचे संपर्कमंत्रीपद उर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे देण्यात आले आहे.
बुलडाणा संपर्कमंत्रीपद अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर तर मुंबई उपनगरचे हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड तर पालकमंत्री सुनील केदार यांना पुण्याचे संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे. मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांना पुण्याचे, नंदुरबारचे पालकमंत्री के.सी.पडवी यांनी धुळे, पालघरचे संपर्कमंत्रीपद, कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वजित कदम यांच्यावर सांगली, सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.