बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांपूर्वीच राष्ट्रवादीचे अनेक दिग्ग्ज नेत्यांनी पक्षांतराचा मार्ग निवडत भाजप- शिवसेनेत प्रवेश केला. तर काही नेते पक्षांतराच्या वाटेवर आहेत. यामुळे राजकारणात एक वेगळीच वळण निर्माण झाली आहे. या पक्षांतराने राष्ट्रवादीचे अनेक नेते चिंतेत आहेत. अशातच एकीकडे काही नेत्यांमध्ये या पक्षांतरामुळे नाराजी आहे तर दुसरीकडे याचा आनंद व्यक्त केला जात आहे. काँग्रेसकडून बंडखोर नेत्यांच्या पक्षांतरानंतर लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र काँग्रेसने आज मुंबई येथील टिळक भवन येथे ‘लाडू वाटपाचा’ कार्यक्रम आयोजित केला होता. याचा व्हिडिओही महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंवर शेअर केला आहे. सामान्य कार्यकर्त्यांचा काँग्रेसच्या विचारधारेवर आणि पक्ष नेतृत्वावर विश्वास आहे. अनेक नेत्यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेस पक्षात कोणतेही दुःखाचे वातावरण नाही तर उलट संधीसाधू आणि स्वार्थी मंडळी पक्षातून गेल्यामुळे पक्षात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. असे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवले.
यावेळी काँग्रेस पार्टी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी तुम्ह आगे बढो हम तुम्हारे साथ हे, असे अनेक नारे यावेळी देण्यात आले. तर आज राष्ट्रवादीचे वैभव पिचड, मधुकरराव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कॉंग्रेसच्या विचारधारेवर व पक्ष नेतृत्वावर सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. पक्षात कोणतेही दुःखाचे वातावरण नसून उलट संधीसाधू व स्वार्थी मंडळी पक्षाशी गद्दारी करून गेल्यामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. यासाठी आज टिळक भवन येथे 'लाडू वाटपाचा' कार्यक्रम आयोजित करण्यात आला. pic.twitter.com/ZRLucoyqbD
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 31, 2019