श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर चवताळलेला पाकिस्तान सतत भारताविरोधी दहशतवादी कारवाया करताना दिसतोय. परंतु जम्मू काश्मीरमध्ये तैनात भारतीय जवानांमुळे यात पाकिस्तानी यशस्वी होऊ शकत नाही. भारतीय सैन्याने आज सांगितले की, पाकिस्तानकडून सतत घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. सेनेचे नॉर्दन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन आणि जम्मू काश्मीर पोलीसांचे डीजी मुनीर खान यांनी श्रीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली.
सैन्याने म्हटले की, “पाकिस्तानकडून रोज घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दोघंही लष्कराशी जोडलेले आहेत.” दहशतवाद्यांनी हे कबुल केल्याचा व्हिडीओ देखील यावेळी सैन्याने दाखवला. या व्हिडीओत सदर दहशतवादी, हल्ल्याबद्दल सांगत आहेत. सैन्याने असेही म्हटले की, पीओके मध्ये पाकिस्तानातील सर्व लाँड पॅडवर मोठ्या संख्येत दहशतवादी घुसखोर आहेत.
लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन म्हणाले की, “पाकिस्तानातील काश्माीर खोऱ्यात शांतीचा भंग करण्यासाठी अनेक दहशतवादी घुसखोरी करण्यासाठी टपून आहेत. 21 ऑगस्ट रोजी आम्ही रोजी आम्ही दोन पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेतले जे लष्कर-ए-तैयबाशी जोडलेले आहेत.”
वयाच्या पंचेचाळिशीत मलायका कशी आहे फिट, जाणून घ्या तिचा ‘डाएट प्लॅन’
फालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
द्राक्षांची कुल्फी : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
अद्रकाचे ‘हे’ घरगुती उपाय माहिती नसतील तुम्हाला, अवश्य ट्राय करा
व्हॅनिला आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
लावा टोमॅटो पेस्ट, कोंडा काही दिवसांतच होईल दूर
टरबूज आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी