पुणे : बहुजननामा ऑनलाईन : मुलाला हरिपाठ पाठ नसल्यामुळे आळंदीतील महाराजांनी 11 वर्षीय मुलाला इतकी बेदम मारहाण केली आहे की, तो मुलगा 4 दिवसांपासून बेशुद्ध आहे. भयंकर गोष्ट म्हणजे मारहाण करणारा महाराज फरार झाला असून पोलीस सुद्धा तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे.
हा प्रकार आळंदी येथील आश्रमातील असून हरिपाठ पाठ नाही म्हणून एक महाराजाने 11 वर्षीय मुलाला बेदम मारहाण केल्यामुळे, तो मूलगा गेले ४ दिवस बेशुध्द अवस्थेत आहे. भगवान पोव्हणे असे मारहाण करणाऱ्या महाराजांचे नाव आहे. मुलाच्या डोके ,छाती ,पोट यावर काठीने मारल्यामुळे त्याला गंभीर इजा झाली आहे.
गेल्या ४ दिवसांपासून मुलाची शुद्ध हरपली असून , बेदम मारहाणीमुळे मुलाच्या हाताला आणि पायाला सूज आली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. हरी पाठाचे पाठांतर न केल्यामुळे मुलाला काठीनं बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित मुलाच्या आईनं केला आहे. मुलाचे आई-वडील महाराजांविरोधात तक्रार दाखल करण्यास गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला टाळाटाळ केल्याचा आरोप आई-वडिलांनी केला आहे.