पुणे (बहुजननामा ऑनलाइन) – सांगली, कोल्हापूर, काऱ्हाडमध्ये पुराने थैमान घातले आहे. या ठिकाणावरचे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुर परिस्थितीचा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा घेतला. यावर अजित पवारांनी ट्विट करत देंवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत मुख्यमंत्री असताना शरद पवार घटनास्थळी हजर राहत लोकांना कशी मदत करत होते याची आठवण करुन दिली.
अजित पवार म्हणाले आहेत की, ”1993ला उस्मानाबादच्या किल्लारी गावात प्रलयकारी भुंकप झाला. शरद पवार साहेब घटनास्थळी स्वतः दाखल झाले. सरकारी यंत्रणांना कामाला लावले. मुंबईतल्या बॉम्ब हल्ल्यावेळीही मदतकार्य राबवलं. पण, मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरसिंग मार्फत पुराचा राज्याच्या पुरस्थितीचा आढाव घेतात.”
राज्यात पुरस्थिती असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भामध्ये आपल्या महाजनादेश यात्रेत व्यस्थ होते. त्यावरुन त्यांच्यावर टिका देखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी ही यात्रा अर्धवट सोडून मुंबईत येवून पुरस्थितीचा आढाव घेण्यास सुरुवात केली होती. पुरग्रस्त ठिकाणी मुख्यमंत्री गेले नाहीत. यावरुन त्यांच्यावर विरोधक टिका करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीची काँग्रेसकडून देखील शिवस्वराज्ययात्रेस सुरुवात झाली आहे. या यात्रेदरम्यान अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या गंगापुरमध्ये गोदावरीच्या काठावर असणाऱ्या पुतळ्यास अभिवादन करून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.