Ajit Pawar-Mahayuti | अजित पवारांनी केलेल्या निलेश लंकेंच्या वक्तव्यावरून महायुतीत वादंग; भाजपचा थेट निशाणा

मुंबई: Ajit Pawar-Mahayuti | विखे पाटलांनी (Vikhe Patil) निलेश लंकेंना (Nilesh Lanke) त्रास दिला आणि म्हणूनच लंके मविआ सोबत गेल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी (Ahmednagar Lok Sabha) निलेश लंके हे महायुतीकडून लढवण्यासाठी तयार होते. पण, नगरची जागा महायुतीकडे असल्याने आम्हाला ती देता आली नाही. दक्षिण नगर आणि माढा या लोकसभा जागांबाबत आम्ही महायुतीत विचारणा केली होती. दक्षिण नगरमधून निलेश लंके आणि माढ्यातून (Madha Lok Sabha) धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) निवडणूक लढणार होते. पण, भाजपने दक्षिण नगर आणि माढ्याची जागा आमच्यासाठी सोडली नाही, असं अजित पवार म्हणाले.
या वक्तव्यानंतर भाजपने अजित पवारांवर थेट निशाणा साधला आहे. अजित पवारांसारख्या नेत्यानं असं बोलणं योग्य नाही असे भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले आहेत. अजित पवारांनी आचारसंहिता पाळावी. जेणेकरून महायुतीवर परिणाम होणार नाही. अशी उणी-धुणी काढायचं म्हटलं तर आम्ही देखील ते काढू. मला वाटतं अजित पवारांसारख्या नेत्याने अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर ते योग्य नाही. शिवाजीराव आढळराव पाटील भाजपकडून लढले असते तर आम्ही जिंकलो असतो, असं आम्ही म्हणू शकतो, असं दरेकर म्हणाले.
यासंदर्भात जेव्हा महायुतीमध्ये मेळावा झाला. त्यावेळी सोनाराने कान टोचले आहेत. नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की, अशा प्रकारचे वक्तव्य कोणी करू नये. जर कोणाला खुमखुमीच असेल तर त्याने वरिष्ठांशी बोलावं आणि आपली खुमखुमी मिटवावी, असं देखील दरेकर म्हणाले आहेत.
Comments are closed.