मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ‘भारताने उचललेलं पाऊल ही एक चांगली गोष्ट आहे. आताच्या परिस्थतीसारखी परिस्थिती पुन्हा येईल असे सांगता येत नाही. पाकिस्तान सध्या कंगाल झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानची आता आर्थिक कोंडी करायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ही एक संधी आहे, अशी प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
तसंच आंबेडकर यांनी वायूसेनेनं दहशतवाद्यांवर केलेल्या हल्ल्याचं जोरदार समर्थन केलं आहे. दरम्यान, पुलवामा इथं दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याचा भारताने हवाई हल्ला करून बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे.
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ‘भारताने उचललेलं पाऊल ही एक चांगली गोष्ट आहे. आताच्या परिस्थतीसारखी परिस्थिती पुन्हा येईल असे सांगता येत नाही. पाकिस्तान सध्या कंगाल झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानची आता आर्थिक कोंडी करायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ही एक संधी आहे, अशी प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
तसंच आंबेडकर यांनी वायूसेनेनं दहशतवाद्यांवर केलेल्या हल्ल्याचं जोरदार समर्थन केलं आहे. दरम्यान, पुलवामा इथं दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याचा भारताने हवाई हल्ला करून बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे.