नवी दिल्ली : पाकिस्तानला कोणत्याही स्तरावर चोख प्रतिउत्तर देण्यासाठी भारत नेहमीच तयार असते, लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी याआधी पाकिस्तानला चांगलेच ठणकावले होते. त्यानंतर आता हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी देखील पाकिस्तानला इशारा दिला आहे. प्रत्येक स्तरावर हवाई दल नेहमीच सज्ज असते. भारत-पाक सीमेवर पाकिस्तानच्या कोणत्याही कुरघोडींना चोख उत्तर देण्यासाठी हवाई दल नेहमीच सर्तक असते.’ असे धनोआ यांनी मंगळवारी सांगितले.
लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी आधीच इशारा दिला होता कि , ‘पाकिस्तानने भारताबरोबर युद्ध केले तर त्यांना त्याची दुप्पट किंमत मोजावी लागेल’. बी. एस. धनोआ आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी संरक्षण साहित्याच्या स्वदेशीकरणासंबंधीच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यावेळी ते बोलत होत होते. बी. एस. धनोआ म्हणाले कि, ‘जुनी युद्ध उपकरणे आणि सामग्री बदलण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित होण्याची वाट पाहू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक उपकरण परदेशातून आयात करणेही योग्य नाही.
आता स्वदेशात विकसित झालेली शस्त्रास्त्रे जुन्या शस्त्रांची जागा घेत आहेत, तरी आपल्याकडील उपकरणे अजूनही तितकीच टिकाऊ आहेत. आपले हवाई दल ४४ वर्षे जुने असलेले मिग-२१ विमान वापरत आहे. इतकी वर्षे तर कोणतीही गाडी चालत नाही. भारत हा जगातील कदाचित एकमेव देश असेल जो इतकी जुनी विमाने वापरत आहे. ‘मिग-२१’ला बदली म्हणून दुसरे कोणतेही विमान उपलब्ध नाही. अश्या परिस्थितीतही हवाई दल सीमेचे संरक्षण करतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशांच्या सीमांवर कार्यरत असते तसेच वेळप्रसंगी चोख उत्तर देण्यास तयारही असते. ”कोणत्याही स्तरावर उत्तर देण्यासाठी हवाई दल पूर्णपणे सक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे’,असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले.