बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यातील सत्ता स्थापनेबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कर्त्यांची आज होणार आहे. मात्र त्याआधी आज संसदेत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक पार पडली. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे समजते. तब्बल ४५ मिनिटे झालेल्या या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा झाली.
भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणार अशी जोरदार चर्चा सुरु असताना या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. या भेटीत पवारांनी मोदींना एक पत्र देखील दिले आहे. ज्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत.
पंतप्रधान आणि शरद पवार यांच्या भेटीतील अपडेट :
संसदेतील मोदींच्या कार्यालयात शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या बैठकीला सुरुवात
बैठक दरम्यान मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना बोलवून घेतले
राष्ट्रपती राजवटीमुळे महाराष्ट्रात पंतप्रधांनी तातडीने हस्तक्षेप करावा-पवार
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीची पावले उचलण्याची पवारांची मागणी
शेतकऱ्यांना बिनशर्त कर्जमाफी देण्याची पवारांची मागणी
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात ४५ मिनिटे चर्चा
Visit : bahujannama.com