मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे किंवा नाही हे फक्त आणि फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच ठाऊक आहे. याबाबत काय ते मुख्यमंत्रीच सांगू शकतात. ते नाराज असतील तर का आहेत हे अद्याप समजलेलं नाही असंही त्यांनी सांगितलं.माध्यामांशी राऊत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “सत्तारांनी जो राजीनामा दिला आहे तो आमच्याकडे येत नाही सत्तारांनी राजीनामा दिला किंवा नाही याबाबतचं सत्य मुख्यमंत्रीच सांगू शकतात. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून अशा प्रकारचं वृत्त आलेलं नाही की, सत्तारांनी राजीनामा दिला आहे.” पक्षात अनेक लोक नाराज आहेत.
मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षात काही लोक नाराज आहेत यासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर राऊत म्हणाले, “ज्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही सांगताय मला नाही वाटत या काही एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत. अशा चिरकूट घटना होत असतात. जे नाराज आहेत ते शिवसैनिक नाहीत. तुम्ही ज्यांचं नाव घेत आहात ते आणि असे सर्व लोक मूळत: शिवसैनिक नाहीत. ते बाहेरून शिवसेनेत आले आहेत. त्यांना या सिस्टीममध्ये अॅडजस्ट व्हायला थोडा वेळ लागेल. त्यांपैकी सत्तार साहेब असू शकतात. परंतु आता जर ते आले आहेत तर पक्षानं त्यांना स्विकारलं आहे. अब्दुल सत्तार असे नेते आहेत जे काही बोलतात त्यावर ठाम असतात.” असंही राऊत म्हणाले.
Visit : bahujannama.com