बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासह मंगळवारी (दि. 8) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नासह इतर काही महत्वाच्या विषयावर चर्चा केली. त्यांनतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांची वैयक्तिक भेट घेतल्याचेही समजते. यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन बोलावून त्यात चर्चा करायला हवी होती. मग त्यांना तुम्ही कधीही भेटा. आता हे भेटून त्यांना काय सांगणार? म्हणजे राजकीय तडजोड, ठीक आहे आम्ही हे करतो पण अस. आपण एकत्र येऊ या म्हणजे परत सत्तांतर होणार, म्हणजे काय? देवाण-घेवाणच होणार ना? काहीतरी असंच होणार असल्याचे मला वाटतय हो की नाही नाही? असे ते म्हणाले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी साता-यातील शासकीय विश्रामगृहात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीनंतर उदयनराजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीबाबत विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. उद्यनराजे म्हणाले की, आता एवढ सगळ चाललयं प्रकरण संपूर्ण राज्यात कोणतरी कोणत्यातरी मजल्यावरून पडत. कोणाच्या गाडीत काय सापडत आहे, कुठेतरी काहीतरी होतय हे सगळं सर्वांना माहित आहे ना. मग त्यात भेटून काय होणार असत. तर काय होणार तुम्ही आम्ही एकत्र येऊ या आपल लग्न परत लावू या आणि समाजाला शांत करू या. म्हणजे काय एकतर मुस्लिमांना पुरा अन् हिंदूंना जाळा एवढंच आता बाकी राहिल आहे. एवढी आग या आरक्षणामुळे लोकांच्या मनात पेटलेली आहे. काय बोलणार? असे उद्यनराजें यावेळी म्हणाले.
कृपया हे देखील वाचा:
Mercedes-Maybach GLS 600 भारतात झाली लाँच, अवघ्या 4.9 सेकंदमध्ये पकडते 100 kmph चा वेग
Mercedes-Maybach GLS 600 भारतात झाली लाँच, अवघ्या 4.9 सेकंदमध्ये पकडते 100 kmph चा वेग
फी साठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा – युवक क्रांती दल
New York Times, CNN यासह 19 आंतरराष्ट्रीय वेबसाईटला जगभरात Error, ओपनच होत नाहीत