बहुजननामा ऑनलाइन टीम – अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द न करता त्या होणारच मात्र त्यासंदर्भात तारखा ठरवण्याचे निर्देश प्रत्येक राज्यांना असतील. युजीसीने दिलेल्या तारखांना परीक्षा घेता येणार नसतील तर नवीन तारखा चर्चा करून ठरवण्यात याव्यात असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यावर पुन्हा एकदा विरोधीपक्ष ा भाजपने ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ’शिक्षण तज्ज्ञ, कुलगुरू यांची मत धुडकावून लावली आणि बबड्याच्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण अहंकार…! ऐकतो कोण? पाडून दाखवा सरकार स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले’, शिवाय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या खोळंबा केल्याची जहरी टीकाही त्यांनी केली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आजत निर्णय दिला आहे. परीक्षा रद्द न होता त्या घेण्याचा निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलायच्या असल्यास युजीसीसोबत चर्चा करून नवीन तारखा जाहीर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत.