मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपा युती झाली परंतु त्यामध्ये आठवले गटाचा विचार काही झाला म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दक्षिण मुंबई ऐवजी आता उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. 5 मार्च रोजी घटक पक्षाची बैठक होणार आहे त्यात भाजपाने हा मतदार संघ आपल्यासाठी सोडावा, यासाठी रणनिती आखणार असल्याचे समजते.
आठवले यांनी युतीची घोषणा होण्यापूर्वी दक्षिण मुंबई मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यासाठी त्यांनी मतदार संघात बैठका आणि मेळाव्यांचा सपाटा लावला होता. आठवले यांच्या या व्युव्हरचनेवरुन भाजपानेच त्यांना या मतदार संघातून तयारी करण्याचे निर्देश दिले असावेत, अशी चर्चा होती. परंतू, युतीची घोषणा झाल्यानंतर ही चर्चा फोल ठरली. या मतदार संघात सेनेचा खासदार असल्यामुळे आठवलेंनी आपला मोर्चा उत्तर-मध्य मुंबई मतदार संघाकडे वळविला आहे.
आठवलेंना भाजपाने आपल्या कोट्यातून राज्यसभा दिली आहे. त्यामुळे ते आतापर्यंतच्या निवडणूक प्रचारामध्ये शिवसेनेच्या व्यासपिठावर सहसा दिसले नाहीत. भविष्यात आठवले सोबत हवे असल्यास सोमयांऐवजी आठवलेंना या मतदार संघासाठी पसंती देऊ शकतात. मात्र, त्यासाठी भाजपाने हा मतदार संघ रिपाइंसाठी सोडावा, असा घटक पक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरावा, अशी 5 मार्च रोजी होणार्या बैठकीत रणनिती आखणार असल्याचे समजते.