बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात स्थापन केलेली महाविकास आघाडी म्हणजे अमर-अकबर-अँथनीचं सरकार आहे अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. यानंतर आता काँग्रेसनंही या टीकेला उत्तर दिलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खास शैलीत दानवेंना उत्तर दिलं आहे.
अनिल देशमुख या प्रकरणी ट्विट केलं आहे. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणतात, “महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनीचं सरकार आहे बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो. कारण होनी को अनहोनी कर दे अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर अँथनी!” असं देशमुख म्हणाले आहेत.
https://twitter.com/
याशिवाय काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही दानवेंना खास शैलीत जशास तसं उत्तर दिलं आहे. सचिन सावंत यांनी रावसाहेब दानवे यांना अमर-अकबर-अँथनी सिनेमातील रॉबर्ट शेठची उपमा दिली आहे. काँग्रेसनं दानवेंना व्हिलन ठरवलं आहे.
https://twitter.com/sachin_
काय म्हणाले होते रावसाहेब दानवे ?
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात स्थापन केलेली महाविकास आघाडी म्हणजे अमर-अकबर-अँथनीचं सरकार आहे. आम्हाला हे सरकार पाडायचं नाही. परंतु तेच जर एकमेकांच्या पायात पाय घालून पडलं तर आम्ही काय करणार ? असा जोरदार टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
रावसाहेब दानवे हे पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना दानवे म्हणाले, “6 वर्षांपासून काँग्रेस आणि मित्र पक्षांना लोकांसमोर जाण्यासाठी कुठलाच मुद्दा नव्हता. आपली मलीन प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे. मोदी आणि तोमर यांनी लोकसभेत शेतकऱ्यांचा माल किमान किमतीला खरेदी करण्यात येईल असं जाहीर केलं आहे. असं असताना काँग्रेस पंजाब-हरियाणामध्ये आंदोलन करत आहे. मिनिमम सपोर्ट प्राईसनं खरेदीचा उल्लेख विधेयकात करा असं काँग्रेस म्हणतंय परंतु काँग्रेसनं देखील तसं केलं नव्हतं. मिनिमम सपोर्ट प्राईस हे मोदी सरकारचं धोरण आहे.”