बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. आतापर्यंत टप्प्याटप्याने चार लॉकडाऊन घेण्यात आले. चौथा लॉकडाऊन आज संपणार आहे. आतापर्यंत तरी देशात तितक्या प्रमाणात कोरोनाव्हायरस वाढल नाही मात्र लॉकडाऊन संपला तर तो इतक्या झपाट्याने वाढेल की, डिसेंबरपर्यंत अर्धा भारत कोरोनाव्हायरसच्या विळख्यात असेल, असा दावा भारतातील तज्ज्ञांनी केला आहे.
न्यूरोव्हायरोलॉजी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सचे प्रमुख कर्नाटकातील कोविड-19 हेल्थ टास्क फोर्सटे नोडल ऑफिसर डॉ. व्ही. रवी यांनी देशात कोरोना व्हायरसच्या कम्युनिटी ट्रान्समिशनबाबत चिंता व्यक्त केली आहे. डॉ. रवी यांनी सांगितले, आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली नाही. 31 मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर जूनपासून हा आकडा वाढेल. देशात कम्युनिटी ट्रान्समिशनही होईल. डिसेंबर अखेरपर्यंत भारतातील निम्मी लोकसंख्या कोरोनाव्हायरसने संक्रमित होईल. 90 टक्के लोकांना माहितीही नसेल की त्यांना कोरोनाव्हायरस झाला आहे. फक्त 5-10 टक्के रुग्णांना हाय फ्लो ऑक्सिजनद्वारे उपचार करावे लागतील. फक्त 5 टक्के रुग्णांना वेंटिलेटरची गरज पडेल. लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यांची ही प्रकरणे हातळण्यासाठी तयार राहायला हवे, असेही डॉ. रवी यांनी सांगितले आहे.