नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार परवेश वर्मा यांनी अनुराग ठाकूर यांच्या वादग्रस्त घोषणाबाजीवरून धक्कादायक विधान केले आहे. ‘जर आपण दिल्लीत सत्तेत आलो तर सरकारी जमिनीवर बांधलेल्या मशिदी काढून टाकू. जर भाजपाला बहुमत मिळाले तर एका तासात शाहीन बागेत एकही निदर्शक राहणार नाही, असे ते पश्चिम दिल्लीतील विकासपुरी विधानसभेच्या रणहौला गावाच्या समुदाय केंद्रात आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते. दक्षिणपूर्व दिल्लीच्या शाहीन बागेत सीएए आणि एनआरसी विरोधात एक महिन्यापेक्षा जास्त काळ आंदोलन सुरु असून मागच्या वर्षी १५ डिसेंबर रोजी जामियानगर मध्ये सीएए विरोधात हिंसक निषेधानंतर हे आंदोलन सुरु झाले होते.
तसेच लोकांना संबोधत परवेश वर्मा यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले की, ‘एक गोष्ट लक्षात ठेवा, ही निवडणूक छोटी नाही. ही देशाची ओळख आणि ऐक्याची निवडणूक आहे. ११ फेब्रुवारीला भाजपाला बहुमत मिळाले तर एका तासात शाहीन बागेत एकजरी निदर्शक दिसला तर तुम्हीसुद्धा इथे आहात आणि मीसुद्धा. म्हणजेच भाजपचे सरकार स्थापित झाल्यानंतर एका तासात शाहीन बागची कामगिरी संपुष्टात येईल. तिथे एकही माणूस दिसणार नाही. ‘तसेच तेथील आंदोलकांवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देत ‘ते लोक तुमच्या घरात प्रवेश करतील आणि तुमच्या बहिण-मुलींचा बलात्कार करतील,’ असे म्हणाले.
#WATCH: BJP MP Parvesh Verma says, "…Lakhs of people gather there (Shaheen Bagh). People of Delhi will have to think & take a decision. They'll enter your houses, rape your sisters&daughters, kill them. There's time today, Modi ji & Amit Shah won't come to save you tomorrow…" pic.twitter.com/1G801z5ZbM
— ANI (@ANI) January 28, 2020
पुढे ते म्हणाले की, ‘मी तुम्हाला वचन देतो की दिल्लीत भाजपाचे सरकार बनल्यास 11 फेब्रुवारी नंतर मला फक्त एका महिन्याचा अवधी द्या. माझ्या लोकसभा मतदारसंघात सरकारी जमिनीवर एकही मशीद बांधली जाणार नाही. मी सर्व मशिदी काढून टाकीन. आपण देश काय बनवणार आहोत.’
Visit : bahujannama.com