लखनौ : बहुजननामा ऑनलाईन – भाजपचे संस्थापक सदस्य व ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या ब्लॉग मधील लिखाणातून भाजप सरकारची वास्तवताच दाखवून दिली आहे. अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांच्या ट्विट वरून केली आहे. भाजपने विरोधकांना कधीही राष्ट्रद्रोही म्हणून संबोधले नव्हते. असे आडवाणी यांनी आपल्या ब्लॉग मध्ये लिहिले आहे. त्यांच्या ब्लॉगचा अधार घेत मायावतींनी ही टीका केली आहे.
६ एप्रिल १९८० हा भाजपच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून त्यांनी हा ब्लॉग लिहिला होता. त्यांनी त्या मध्ये या ५ वर्षातील मोदी सरकारच्या कार्यपध्दतीवर तसेच देशातील वास्तव परिस्थिती दाखवण्याचे काम केले आहे. आडवाणी यांनी एक प्रकारे मोदींच्या कार्यपद्धतीवर अविश्वासच व्यक्त केला आहे. असे मायावती यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे. भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येण्याच्या लायकीचे नाही. असेच बहुधा आडवाणी यांना म्हणायचे असावे. अशी शेरेबाजीही त्यांनी केली आहे.