बहुजननामा ऑनलाईन – गेल्या १५ दिवसापासून पावसाने महाराष्ट्रासहित इतर राज्यामध्ये ही थैमान घातले आहे. यात महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर महापूरामुळे खूप जीवितहानी झाली. अनेक लोकांचे संसार नष्ट झाले या महापूरात सांगली जिल्हातील ब्रम्हनाळ गावतील अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकांचे संसार वाहून गेले. त्यामुळे येथील नागरिकांचे संसार पुन्हा नव्याने उभे करण्यास मदत म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे गाव दत्तक घेतले आहे.
दरम्यान सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील ब्रम्हऩाळ गावात पुराचे पाणी शिरले होते. या महापूरात ब्राम्हनाळ हे पूर्ण गाव पाण्यात होते. त्यामुळे इथे स्थानिक नागरिक बचावकार्य करत होते. तेवढ्यात बोट पाण्यात उलटली आणि यात १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे या पूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे. त्यामुळे या गावाला मदत करून येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी हे गाव दत्तक घेतले आहे.
या पार्श्वभूमीवर गावातील ७०० कुंटुंब म्हणजेच ३५०० लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. या पुरग्रस्तांच्या संकट काळात ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतल्याने गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ब्रम्हनाळ ग्रामपंचायतीने पत्र देऊन आम्ही पुनर्वसनासाठी आमचे गाव देत आहोत असं सांगितलं आहे.
गावाला ही मदत दिली जाणार आहे –
१) महापूरामुळे संपूर्ण गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी व औषध उपचार करणे गरजेचे असल्याने हे काम अगोदर पूर्ण केले जाणार आहे.
२) तसेच या गावातील ७०० कुंटुंबाना पुढील १ महिना पुरेल एवढी राशनची व्यवस्था करण्यात येणार आहे.
३) या गावातील शालेय विदयार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य दिले जाईल.
४) स्वच्छ पाण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी म्हणून गावात वॉटर एटीएम लावण्यात येणार आहे.
५) गावातील नागरिकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मानस उपचार कार्यक्रम गावात वर्षभर राबविले जाणार आहेत.
६) तसेच गावकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई सरकारकडून मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.