नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखाद्या व्यक्तीकडे जिद्द आणि चिकाटी असेल त्याच्यापासून यश कधीच लांब जाऊ शकत नाही. त्यामुळे जर आपल्याला आयुष्यात यश मिळवायचे असेल असेल या दोन्ही गोष्टी असणे महत्वाचे आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने आपल्या यशाचे शिखर गाठू शकतो. याचे एक उदाहरण म्हणजे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा राजू. याची नुकतीच सब इन्स्पेक्टरसाठी निवड झाली आहे.
राजस्थान-भारत-पाक सीमेला लागून असलेल्या बाडमेरमध्ये आजकाल प्रत्येकजण राजू तंवरवर चर्चा करताना दिसत आहे. वेटर म्हणून काम करत असतानाही राजूने आपला अभ्यास सुरू ठेवला. नुकत्याच जाहीर झालेल्या पदावर सब इन्स्पेक्टर म्हणून राजूने राजस्थानमधील एससी प्रवर्गात आठवा क्रमांक मिळविला आहे.
बाडमेरच्या शिव तहसीलमधील छोट्याशा गावात राजदळच्या राजू तंवरने संपूर्ण राजस्थानमध्ये 347 वा क्रमांक मिळविला आहे. गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर राजू याने एमबीसी माध्यमिक विद्यालय गांधी चौक बाडमेर येथे पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उच्च माध्यमिक उत्तीर्ण झाल्यानंतर राजूने हॉटेल्समध्ये वेटर म्हणून काम सुरू केले. हॉटेल्समध्ये काम करण्याबरोबरच राजूने अभ्यासाची आवड आणि कठोर परिश्रम कायम ठेवले. यामुळे आज राजूने हे स्थान गाठले आहे.
राजूचे वडील पुरखाराम पीएचईडीमध्ये फिटर म्हणून निवृत्त झाले आहेत. राजूचा चुलत भाऊ दिनेश तंवर जोधपूर येथे सीआरपीएफमध्ये सहायक कमांडेंट म्हणून तैनात आहेत. चुलतभावाची प्रेरणा घेऊन राजूने आपले लक्ष्य म्हणून पोलिस सेवेची निवड केली. राजूच्या निवडीमुळे त्याच्या संपूर्ण गावात आनंदाची लाट पसरली असताना राजूचे घर मात्र अभिनंदनांनी भरलेले आहे. राजू म्हणतो की, संघर्ष करण्यासाठी मागे हटायचे नाही कारण तेच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहचवते.