मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) असताना राज्यात दोन कंपन्या गुंतवणूक (Investment) करणार होत्या. ‘वेदांता’ (Vedanta) आणि ‘फॉक्सकॉन’ (Foxconn) या दोन मोठ्या कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करणार होत्या. पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अचानक या दोन्ही कंपन्या गुजरातला (Gujarat) गेल्या. वेदांतसारखी कंपनी राज्यात तब्बल एक लाख तरुणांना रोजगार देणार होती. पण ही कंपनी गुजरातला गेली. यामुळे शिवसेना आमदार (Shivsena MLA) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर (Shinde Government) सडकून टीका केली. राज्यातील सरकार हे खोके सरकार आहे. जीत के हारने वालो को खोके सरकार कहतै है, अशी टीका आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
https://fb.watch/fwcvAQe833/
वेदांता प्रकल्प राज्यात येणार होता. पण तो प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पामुळे राज्यातील एक लाख तरुणांना रोजगार मिळू शकला असता. राज्यातील ही गुंतवणूक नेमकी का निघून गेली ते स्पष्ट करा. वेदांता कंपनीच्या अनिल अग्रवाल (Anil Aggarwal) यांच्याशी चर्चा केली होती. फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्राबाहेर गेली. महाराष्ट्रात येणारी कंपनी शेवटच्या मिनिटाला गुजरातला निघून गेली. ती का निघून गेली? असा सवाल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे.
खोके सरकार राजकारणात व घराघरात फिरण्यात व्यस्त आहे. प्रशासनावर, कायदा सुव्यवस्थेवर कोणाचाच अंकुश नाही. खोके सरकारला माझी विनंती आहे, पिस्तुल काढणं, धक्काबुक्की करणं, गुंडगिरीची भाषा करणं सोडून द्या आणि अशा मोठ्या इंडस्ट्रीजना राज्यात आणावं जेणेकरून तरुण बेरोजगारांना रोजगार मिळेल.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 13, 2022
पुणे जिल्ह्यातील तळेगाव (Talegaon) या ठिकाणी इंडस्ट्री येणार होती.
1.75 लाख कोटींची गुंतवणूक होती. ही कंपनी 75 हजार रोजगार निर्माण करणार होती.
मात्र कंपनी महाराष्ट्राबाहेर गेली तेव्हा खोके सरकार काय करत होते? एका महिन्यात असं काय घडलं की ही गुंतवणूक राज्याबाहेर कशी काय गेली? या राज्यात आम्ही साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणत होतो.
दावोसमध्ये आम्ही या संदर्भात अनेक बैठका घेतल्या होत्या.
महाराष्ट्रात ही कंपनी येणार होती तर मग दुसऱ्या राज्यात का आणि कशी गेली?
राज्यातील खरे मुख्यमंत्री कोण असतील त्यांनी खुलासा करावा, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हा प्रोजेक्ट इतर राज्यात गेला त्याचे दुःख नाही, पण आपल्या राज्यात का आला नाही, याचे आश्चर्य आहे. ज्या प्रोजेक्टवर एवढं काम करून मविआ सरकारने एवढं पाठबळ देऊनही हा प्रोजेक्ट तिथे जाणे, याचा अर्थ हाच आहे की नवीन गुंतवणुकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 13, 2022
मंत्रालयात बसून काम करणे गरजेचे आहे. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके. राज्य सरकारचा कुठे अंकुश दिसत नाही. एक लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
वेदांतचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे समजले. वेदांतला आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे, हे चांगलेच आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेऊन, भेटीगाठी करून पुण्याजवळ हा प्रोजेक्ट येईल, या हेतूने काम करत होतो. pic.twitter.com/ipBwOWLKvW
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 13, 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Aditya Thackeray | aditya thackerays anger as the project coming to pune calls gujarat a khoke sarkar to shinde government
हे देखील वाचा :
Pune Crime | पत्त्याच्या क्लबवर गुन्हे शाखेचा छापा, 12 जण ताब्यात