नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन – बॉलीवुडचे प्रसिद्ध अभिनेते रजा मुराद आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडत असतात. आता त्यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावर मोठे वक्तव्य केले आहे. रजा मुराद म्हणणे आहे की, जर गायक अदनान सामीला नागरिकत्व देऊ शकता, तर बाकी लोकांना का देऊ शकत नाही.
सीएए वर काय म्हणाले रजा मुराद?
एका वृत्तवाहिनीशी बोलातना रजा मुराद म्हणाले की, हा कायदा आपल्या संविधानाच्या विरोधात आहे. सरकारने हा कायदा मागे घेतला पाहिजे. अदनान सामीला नागरिकत्व देऊ शकता मग इतरांना का नाही? त्यांच्या वडीलांनी तर आपल्यावर 1965 च्या लढाईत बॉम्बफेक केली होती.
का घेतले अदनान सामीचे नाव
गायक अदनान सामीला 2016 मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते. सीएए वर अदनान सामीनेही आपली प्रतिक्रिया दिली होती. त्याने म्हटले होते की, सीएए त्या धर्माच्या लोकांसाठी आहे ज्यांना धर्मशासित देशांमध्ये छळले जाते. मुस्लिम लोकांना आपल्या धर्मामुळे पाकिस्तान, बांगलादेश अथवा अफगानिस्तानमध्ये छळले जात नाही. कारण ते बहुसंख्यांक आहेत. मुस्लिम समुदाय अजूनही भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतो. कायदेशीर पद्धतीने सर्वांचे स्वागत आहे.
नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसीवर संपूर्ण देशात वाद सुरू आहे. देशातील अनेक भागात या कायद्याविरोधात आंदोलने होत आहेत. तर काही राज्यांमध्ये हिंसक आंदोलने होत आहेत. बॉलीवुडमध्येही कलाकार आपले मत उघडपणे मांडत आहेत. तर काही कलाकार गप्प असल्याचे दिसत आहेत.
तर विक्की कौशल, आयुष्मान खुराना, राजकुमार राव यांनी जामिया मिलिया विद्यापीठातील हिंसेवरून नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, जावेद जाफरी, ऋचा चड्डा, हुमा कुरेशी, फरहान अख्तर आणि अली फजल सारख्या कलाकारांनी या कायद्यावर जोरदार टीका केली आहे.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा