मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैतिकची भूमिका साकारणा-या करण मेहराला Karan Mehra पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी अभिनेत्री निशा रावल हीने पती करण विरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गोरेगाव पोलिसांनी करणला अटक केली आहे. घरगुती हिसांचार प्रकरणी करणला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून करण Karan Mehra आणि निशा यांच्यात वाद सुरु होते. तसेच या दोघांचे वैवाहिक जीवन सुरळीत नसल्याच्या बातम्या येत होत्या. यावर करणने काही दिवसांपूर्वी स्पष्टीकरण देत म्हटले होते की, गेल्या काही दिवसांपासून निशा आणि माझ्या नात्यावर प्रश्न निर्माण केले जात आहे. आमच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगत आहेत. या सगळ्या बातम्यांमुळे मी खूप अस्वस्थ झालो आहे. मीडियात आमच्याविषयी समोर येणा-या चर्चा अफवा आहेत. आम्ही दोघेही एकत्रच राहत असून आमच्यात कोणताही वाद झालेला नाही. माझी तब्येत बरी नसून सध्या पत्नी निशाच माझी काळजी घेत असल्याचे त्याने म्हटले होते.
करण आणि निशा यांनी 6 वर्षे डेटिंग केल्यानतंर नोव्हेंबर 2012 मध्ये लग्न केले होते. करणने ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका सोडल्यानंतर बिग बॉसच्या 10 व्या पर्वातही कंटेस्टंट म्हणून झळकला होता. त्यानंतर करण खटमले इश्क या मालिकेत झळकला होता. तर निशाही टीव्ही अभिनेत्री आहे. निशाने मैं लक्ष्मी तेरे आंगन की, आने वाला पल, केसर, या मालिकांमध्ये झळकली होती.तर करण आणि निशा रिॲलिटी शो नच बलिएमध्ये एकत्र झळकले होते. या कपलाला एक मुलगा असून त्याचे नाव कविश असे आहे.
‘नेमकं चाललंय काय? मलाही प्रश्न पडलाय’, पवार-फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांची सूचक प्रतिक्रिया
तब्बल 20 वर्षांनी गोविंदा आणि नीलम आले एकत्र
15 तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाला कोरोनाची बाधा; आईची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह
‘हा’ काढा ठरतोय रामबाण उपाय ! रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वजनही घटवा; जाणून घ्या