बहुजननामा ऑनलाईन टीम : फिल्म एक्झिबिटर अक्षय राठी (Akshaye Rathi) नं सोशल मीडियावर ट्विट करत बॉलिवूड अॅक्टर अक्षय कुमार (Akshay Kumar) च्या कामाचं भरभरून कौतुक केलं. त्यानं अक्षयच्या शुटींगच्या अंदाजाचं कौतुक केलं आहे.
ट्विट करत त्यानं लिहिलं की, ही किती भारी गोष्ट आहे की, अक्षय कुमार त्या काळात एक सिनेमा पूर्ण करतात जेवढ्या वेळेत दुसरा एखादा कलाकार एखादं स्किल शिकतो. त्याचे सिनेमेही हिट होतात. दुसऱ्या स्टार्सला काही चांगलं करावं लागेल. चांगलं प्लॅनिंग करावं लागेल.
Amazing how @akshaykumar finishes off the shoot of an entire film in the amount of time that other stars take to learn a skill which they need to act out in a small scene or so! And more often than not, his film turns out to be the bigger hit! More actors need to ‘plan’ better!
— Akshaye Rathi / अक्षय राठी (@akshayerathi) December 16, 2020
या ट्विटवर आता अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यानं नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या मते कुणा एकाचं कौतुक करत वाईट नाहीये परंतु दुसऱ्या कलाकारांना नीचा दाखवणं हे चुकीचं आहे.
अक्षयच्या ट्विटला उत्तर देत अभिषेक म्हणतो, हे योग्य नाहीये. प्रत्येक माणसू काम करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींनी मोटीवेट होऊ शकतो. सर्वांचा काम करण्याचा आपापला स्पीड असतो.
https://twitter.com/juniorbachchan/status/1339099858569850881?s=20
परंतु हे ट्विटर वॉर इथंच शांत नाही झालं. यानंतर अक्षय राठीनं ट्विट केलं की, स्थिती सामान्य असेल तेव्हा हे सगळं ठिक आहे. परंतु आता मात्र जास्तीत जास्त काम जनरेट करण्याची गरज आहे. कलाकारांना त्यांचा स्पीड आणि टेम्पो वाढवण्याची गरज आहे. यामुळं लोकांमध्ये आशा निर्माण होईल.
परंतु अभिषेक बच्चनला ही गोष्ट पचली नाही. त्यानं जोर देत हे समजावण्याचा प्रयत्न केला की, कधीच जास्त सिनेमा केल्यानं काही होत नाही. तर चांगेल सिनेमे करण्याची गरज आहे. चांगल्या कामानंच चांगले सिनेमे करण्याची संधी मिळते.
https://twitter.com/juniorbachchan/status/1339109718174834689?s=20
अभिषेकच्या मते, जास्त सिनेमे केल्यानं दीर्घकाळात इंडस्ट्रीचं नुकसानच होणार आहे. कारण क्वालिटी सोबत तडजोड सुरू होईल. क्वालिटी मेंटेन करत पुढं जाणं आवश्यक आहे.