वाराणसी : वृत्तसंस्था – बनारस येथे राहणारे रमेश मिश्रा एका प्रायव्हेट शाळेत टीचर होते. सर्वकाही ठिक चालले होते, परंतु अचानक कोरोना महामारी सुरू झाली आणि सर्वच गोष्टी बदलू लागल्या. शाळेच्या नोकरीत अडचणी येऊ लागल्या तेव्हा नोकरी सोडली. पण, आता प्रश्न हा होता की, पुढे काय करायचे? रमेश यांनी खुप विचार केल्यानंतर स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मित्राचे काम सुद्धा कोरोनामुळे बंद पडले होते, त्याससोबत घेतले आणि स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली. सुरूवातीला काही अडचणी आल्या, परंतु आता ही शेती रमेश यांना लाखो रूपयांचा नफा देत आहे. फूड आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये स्ट्रॉबेरीला खुप डिमांड आहे.
लॉकडाऊनच्या संकटातून काढला नवा मार्ग
रमेश मिश्रा बनारसजवळील एका गावातील आहेत. बीएचयूमधून ग्रॅज्युएट आहेत आणि बास्केटबॉलमध्ये इंटर युनिव्हर्सिटी लेव्हलपर्यंत खेळले आहेत. टिचिंगचा दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. रमेश सांगतात, लॉकडाऊन लागल्यानंतर लोकांच्या नोकर्या सतत जात होत्या. मी दुसरे काम पहात होतो. रोज तासानतास इंटरनेटवर सर्च करत होतो की, काय करावे, परंतु समजत नव्हते काय करावे. काही लोकांनी सांगितले की, स्ट्रॉबेरीच्या शेतात खुप नफा आहे, परंतु मला याबाबत काहीही माहिती नव्हते. जवळपासच्या परिसरात सुद्धा स्ट्रॉबेरीची शेती कुणी करत नव्हते.
माहिती घेण्यासाठी गाठले पुणे
नंतर इंटरनेटवर रमेश यांना समजले की, पुण्यात स्ट्रॉबेरीची शेती करणारे अनेक लोक आहेत. यानंतर ते पुण्याला आले आणि येथे अनेक आठवडे राहून स्ट्रॉबेरीच्या शेतीचे बारकावे जाणून घेतले. ते सांगतात की, पुण्यात रोपांची देखभाल, ठिबक सिंचन, यासारख्या गोष्टी शिकलो. या गोष्टीचा सुद्धा अंदाज आला की, या शेतीसाठी सुरुवातीला किती जमीन हवी आणि यामध्ये किती पैसे लागतील.
स्ट्रॉबेरीच्या रोपांची देखभाल मुलांसारखी करावी लागते, यासाठी रमेश यांनी सात महिलांना कामावर ठेवले, ज्या या रोपांची देखभाल करतात.
पुण्यातून 15 हजार रोपे मागवली, एका रोपाची किंमत 15 रुपये
स्ट्रॉबेरीची शेती नफा देणारी व्हावी, यासाठी किमान एक एकर जमीन हवी होती. रमेश सांगतात की, माझ्याकडे इतकी जमीन नव्हती, परंतु ही अडचण सुद्धा दूर झाली. माझा मित्र मदन मोहन तिवारी रेल्वेत सप्लायचे काम करत होता, परंतु कोरोनामुळे त्याचे काम बंद पडले होते. मी त्याच्या पुढे स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रस्ताव ठेवला आणि तो तयार झाला. मदन सोबतीला आल्यानंतर जमीनीची अडचण दूर झाली. मदनने तीन एकर जमीनीची व्यवस्था केली. ज्यापैकी दोन एकरात स्ट्रॉबेरी आणि एक एकरात भाजी लावली.
मदन सांगतात, लॉकडाऊनचा सर्वात मोठा धडा हा आहे की, नोकरीतून कुणालाही काढले जाऊ शकते, यासाठी काहीतरी स्वत:चे असावे.
300 रुपये प्रति किलोच्या भावाने विकतात स्ट्रॉबेरी
उत्पादन विकण्याबाबत रमेश सांगतात की, नोव्हेंबर 2020 मध्ये आम्ही दिल्लीला माल पाठवण्यासाठी चर्चा केली. परंतु नंतर लोकल मार्केटमधूनच डिमांड येऊ लागली तेव्हा आम्ही बनारस आणि जवळपास स्ट्रॉबेरीचा पुरवठा करू लागलो. येथे 300 रुपये प्रति किलोच्या भावाने आम्ही स्ट्रॉबेरी विकतो. एका रोपातून 500 ते 700 ग्रॅमपर्यंत स्ट्रॉबेरी मिळते.