‘आधार’कार्ड तुमच्या नागरिकतेचा ‘पुरावा’ आहे की नाही ? UIDAI नं दिलं मोठं स्पष्टीकरण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोण नागरिक आहे, कोण नागरिक नाही… या चर्चेच्या पार्श्वभूमीवर (UIDAI) यूआयडीएआयने हे स्पष्ट केले आहे की, आधार कार्ड हे तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा नाही. त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की, यूआयडीएआयच्या कार्यालयातून घुसखोर किंवा बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणार्या कोणालाही त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी नोटिसा पाठविल्या जात नाहीत, परंतु हैदराबादसारख्या काही राज्यात चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांद्वारे आधार बनविल्याची बाब उघडकीस आली होती, अशी माहिती पोलिसांनी हैदराबाद विभागीय कार्यालयात पाठविली होती.
अहवालात पोलिसांनी असे म्हटले आहे की, अशी 127 प्रकरणे आहेत, जी प्राथमिक माहितीनुसार भारतात बेकायदेशीरपणे दाखल झाली होती आणि त्यांच्याकडे आधार असल्याचे आढळले होते. कायद्यानुसार असे आधार कार्डे जे चुकीच्या पद्धतीने घेतले गेली आहे, ते रद्द केली जाऊ शकते. या कायद्यात असेही म्हटले आहे की आधार हे भारताचे नागरिक होण्यासाठी ओळखपत्र नाही, तर ते हे सांगते की अमुक व्यक्ती आधार मिळवण्याच्या 18२ दिवस आधी भारतात राहिला आहे.
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये बेकायदेशीरपणे भारतात आलेल्यांना आधार न देण्याचे निर्देश दिले होते. ज्यांनी आधार बेकायदेशीरपणे घेतले होते त्यांना प्रादेशिक कार्यालयात बोलविण्यात आले आहे, जेणेकरून ते त्यांचा आधार दावा रद्द करण्यापूर्वी सादर करू शकतील. यासाठी, त्या 127 लोकांना 20 फेब्रुवारी पर्यंत वेळ दिला आहे. जेणेकरुन ते रीजनल ऑफिसमध्ये जाऊन आपली माहिती खरी सांगेन.
Comments are closed.