मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी २५,८३३ एवढे नवीन रुग्ण सापडले आहेत, तर मुंबईने दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे. मुंबईत ३,०६२ एवढे नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनानाबाबत असणाऱ्या नियमांचे लोकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. वारंवार आवाहन करूनही नियम पाळेल जात नसल्याने बाधितांचा चालला आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये राज्यात बाधितांची संख्या एक लाख नऊ हजार १७८ एवढी झाली आहे. सक्रिय रुग्ण एक लाख ७७ हजार ५६० इतके असल्याने कोरोना नियंत्रणाचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्यानंतर दररोज रुग्णसंख्या वाढू लागली. त्यामुळे सरकारने काही ठिकाणी पुन्हा निर्बंध लागू केले. मात्र संपर्कातून पसरणाऱ्या कोरोनाला अटकाव करणे शक्य झालेले नाही. शुक्रवारी राज्यात १४,४०० जण कोरोनामुक्त झाले तर ८ लाख ६७ हजार रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर ७,८४८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून शुक्रवारी ७० जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्युदर २.२० एवढा आहे.
देशातील इतर राज्यातील परिस्थिती देखील अशीच आहे तेथेहि बाधितांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी देशात ३५,८७० नवे रुग्ण आढळून आले. हा आकडा हा यंदाच्या वर्षीचा, तसेच गेल्या ११० दिवसांतील सर्वांत मोठा आहे. देशात शुक्रवारी १५४ जणांचा मृत्यू पावला. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार बाधितांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचे दिसत आहे याच पार्श्वभूमीवर भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात एक ट्विट केले असून त्याला ठाकरे सरकारची पोरं हुश्शार… असं हेडिंग दिले आहे त्यानंतर देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ७२ टक्क्यांचा वाटा उचलून ठाकरे सरकारने महाराष्ट्रावर नामुष्की आणली आहे. कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचा इशारा केंद्रानं दिल्यावरही ठाकरे सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष करून हट्टानं हा कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावलाय, असं म्हणत ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ७२ टक्क्यांचा वाटा उचलून ठाकरे सरकारने महाराष्ट्रावर नामुष्की आणली आहे. कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचा इशारा केंद्रानं दिल्यावरही ठाकरे सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष करून हट्टानं हा कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावलाय. pic.twitter.com/D0h8rlhqNN
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 19, 2021
मुंबईत कोरोनाबाधितांचा उच्चांक
गेल्या वर्षी ८ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत दिवसभरात सर्वाधिक २८४८ रुग्ण नोंदवले गेले होते. त्या तुलनेत शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक तीन हजार ६२ रुग्णांची नोंद झाली असून, दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत १२४ दिवसांवर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आला आहे, तर सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण ०.५६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
४८ तासांमध्ये सज्ज व्हा
गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेत प्रशासन सज्ज झाले आहे. गत वर्षी जुलै २०२० मधील स्थितीशी तुलना करता, शासकीय रुग्णालयांमधील खाटांची संख्या अधिक आहे. पालिका रुग्णालयात संख्या वाढवण्याचे काम सुरु असून सर्व खासगी रुग्णालयांनी येत्या ४८ तासांमध्ये पुन्हा कोविड खाटांची संख्या वाढवावी, अशी सूचना मुंबई पालिका आयुक्तांनी केली आहे. एवढेच नाही तर यामध्ये ऑक्सिजन, आयसीयू खाटा असाव्यात, त्यासाठी साधनसामग्री व मनुष्यबळ आदी सर्व व्यवस्था युद्धपातळीवर करून सर्व कार्यवाही पूर्ण केल्याची माहितीहि संबंधित रुग्णालयांनी ४८ तासांची मुदत संपताच पालिकेला देण्याचे आदेश दिले आहेत.