मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भारतात लाच घेण्याची प्रकरण आपण दिवसेंदिवस पाहत आहोत. त्यात आता एका सर्वेक्षणानाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास ५१ टक्के भारतीयांनी भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहेत. त्यात सर्वाधिक लाच ही मालमत्ता नोंदणी केंद्र, पोलिस खाते आणि नगरपालिका या सरकारी ठिकाणी मागितल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. या सर्वेक्षणात १ लाख ९० हजार लोकांनी सहभाग घेतला होता. परंतु महत्वाची बाब म्हणजे सर्वात जास्त भ्रष्टाचार करणाऱ्या आठ राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश नाही.
राज्यातील सर्वात भ्रष्ट राज्ये :
१) राजस्थान- ७८ टक्के नागरिकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार राजस्थान हे राज्य सर्वात भ्रष्ट म्हणून उघडकीस आले आहे. सुमारे २२ टक्के लोकांना अनेक वेळा लाच द्यावी लागली. त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागली. त्यातील ५६ टक्के लोकांनी फक्त एकदाच किंवा दोनदा लाच दिली.
२) बिहार- बिहार राज्यातील ७५ टक्के नागरिकांनी लाच दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील ५० टक्के लोकांनी अनेक वेळा पैसे दिले. तर २५ टक्के लोकांनी फक्त एकदाच किंवा दोनदा लाच दिली नाही, तर २५ टक्के लोकांनी लाच घेतल्याशिवाय आपले काम पूर्ण केल्याचे सांगितले.
३) झारखंड- झारखंडमधील एकूण ७४ टक्के नागरिकांनी त्यांचे कामकाज करण्यासाठीचे अधिकारी हे लाच अधिकारी आहेत. फक्त १३ टक्के लोकांनी पैसे न देता आपले काम पूर्ण केल्याचे सांगितले.
४) उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशमधील सर्वेक्षणात सहभागींपैकी ७४ टक्के लोकांनी आपले काम पूर्ण करण्यासाठी लाच दिली असल्याची कबुली दिली आहे. त्यापैकी ५७ टक्के लोकांनी अनेक वेळा लाच दिली असून सुमारे १७ टक्के लोकांना एकदा किंवा दोनदा लाच द्यावी लागली. तर फक्त ३ टक्के लोकांनी लाच न देता काम केल्याचे सांगितले.
५) तेलंगणा – सुमारे ६७ टक्के तेलंगणातील नागरिक म्हणाले की असंख्य प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी लाच दिली. त्यापैकी ५६ टक्के लोकांनी अनेक वेळा लाच देण्याचे कबूल केले. तर ११ टक्के लोकांनी एकदा किंवा दोनदा लाच दिली. एकूण ११ टक्के लोकांनी अनधिकृत पैसे न देता काम पूर्ण केल्याचे सांगितले आहे.
६) पंजाब – पंजाबमधीलदेखील ६३ टक्के नागरिकांनी त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी लाच दिल्याची कबुली दिली आहे. त्यापैकी २७ टक्के लोकांनी अनेकदा लाच दिली तर ३६ टक्के लोकांनी एकदा किंवा दोनदा लाच दिली. जवळजवळ २७ टक्के लोकांनी टेबलवर पैसे न देता काम पूर्ण केले.
७). कर्नाटक- कर्नाटकातील ६३ टक्के रहिवाशांनी अधिकृत काम करण्यासाठी लाच दिल्याची कबुली दिली आहे. यापैकी ३५ टक्के लोकांना अनेकदा लाच द्यावी लागली तर २८ टक्के लोकांनी फक्त एकदाच किंवा दोनदा लाच दिली. सुमारे ९ टक्के लोकांनी लाच न देता काम पूर्ण केल्याचे सांगितले.
८) तमिळनाडू – तमिळनाडूच्या सुमारे ६२ टक्के नागरिकांनी सरकारी काम पूर्ण करण्यासााठी लाच दिल्याचे कबूल केले आहे. तर २७ टक्के नागरिकांनी काम पूर्ण करण्यासाठी एकदा किंवा दोनदा लाच दिल्याचे सांगितले आहे. केवळ ८ टक्केच लोक असे आहेत कि ज्यांनी एकदाही लाच घेतलेली नसून काम पूर्ण केल्याचे सांगितले आहे. दरम्यान, सध्या भ्रष्टाचारी देशाच्या क्रमवारीत भारताची घसरण झाली आहे. पासपोर्ट आणि रेल्वे तिकीटासारख्या सुविधा केंद्र यासारख्या सरकारी सुविधा संगणीकृत केल्याने भारतात भ्रष्टचारात घट झाल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
Visit : bahujannama.com