बुलढाणा : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेस नेते (Congress) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो’ (Bharat Jodo) पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या निमित्ताने आता विरोधी पक्षाकडून राहुल गांधी आणि त्यांच्या पदयात्रेवर भाष्य आणि विरोध केला जात आहे. शिंदे गटातील (Shinde Group) बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव (Pratap Jadhav) यांनी यात्रेवर भाष्य केले आहे. राहुल गांधींनी विखुरलेल्या पक्षाला जोडण्यासाठी यात्रा काढली असती, तर ते संयुक्तिक झाले असते, असे प्रताप जाधव (Pratap Jadhav) म्हणाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत आहेत. पण भारत कुठेच तुटलेला नाही. भारत काँग्रेसच्या काळात स्वातंत्र्य मिळवत असतानाच तुटलेला आहे. काश्मीर, पाकिस्तान आणि बांगलादेश आदी भाग भारतापासून तुटले आहेत. त्यामुळे त्याठिकाणी भारत जोडो यात्रेची सर्वात जास्त गरज आहे. त्यांनी त्या ठिकाणी यात्रा काढली पाहिजे. त्यांनी देशात यात्रा काढली, त्यापेक्षा पाकिस्तान आणि काश्मीरचा जो भाग तुटला आहे, तिकडे यात्रा काढली पाहिेजे. तसेच त्यांनी विखुरलेल्या काँग्रेस पक्षाला जोडण्यासाठी यात्रा काढली पाहिजे होती, असे प्रताप जाधव म्हणाले.
दरम्यान प्रताव जाधव यांनी यापूर्वी मोठा गौप्यस्फोट देखील केला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
गटाचे आमदारच नाहीत, तर अनेक खासदार देखील अस्वस्थ आहेत.
ते सर्वजण मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेत आहेत.
तसेच त्यांच्यापैकी अनेकजण आमच्या मंत्र्यांची देखील सह्याद्रीवर जाऊन भेट घेत आहेत.
मी या सर्वाचा स्वत: साक्षीदार आहे, असेही प्रताप जाधव म्हणाले.
Web Title :- Pratap Jadhav | Had Rahul Gandhi embarked on a yatra to unite the fragmented party, it would have been united
हे देखील वाचा :
Riteish Deshmukh | रितेश देशमुख आणि जेनेलियाचा नवा चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी केलेली चूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुरुस्त केली आहे – जयकुमार गोरे