कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – सध्या महाराष्ट्रातील पडलेल्या भीषण दुष्काळाचा विचार करता राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील मुलींना मदत म्हणून १० तालुक्यांतील ५० हजार मुलींना नऊ महिन्यांचा पास, गणवेश देणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून ही घोषणा केली. यामध्ये दुष्काळग्रस्त मुलींच्या शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू त्यांना देण्यात येणार आहेत. सध्या २० लाख रुपये संकलित झाले असून पुढील तीन दिवसात पाटील यांच्या कार्यालयामध्ये निधी संकलन करण्यात येणार आहे.
जी लोकं कर्जमाफीपासून वंचित राहिली आहेत त्यांच्याबाबत येत्या अधिवेशनात म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये उर्वरित कर्जमाफीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ज्यांना कर्जमाफी मिळालेली नाही, त्यापासून वंचित राहिलेल्या अशा लोकांना कर्ज माफी देता येईल याबाबत आकडेमोड सुरू असल्याचे ते म्हणाले.