मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गोरगरीब बांधकाम कामगारांना राज्य सरकारच्या वतीने आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार आता नोंदणीकृत असलेल्या 13 लाखांपैकी 9 लाख 17 हजार बांधकाम कामगारांना राज्य सरकारच्या वतीने अर्थसाह्य देण्यात आले आहे. मागील चार दिवासांमध्ये कामगार विभागाच्या वतीने 137 कोटी 61 लाख रुपयांचा निधी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा झाला असल्याची माहिती मंत्री हसन मश्रीफ यांनी दिली.
राज्यात कोरोना संकट असल्याने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात राज्यातील बांधकाम कामगारांना अर्थसाह्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत, बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात दीड हजार रुपयांचे अर्थसाह्य त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.
या निर्णयाचा फायदा राज्यातील नोंदणीकृत कामगारांना मिळत असून महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मागील वर्षी देखील कोरोना काळात नोंदणी बंधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली होती, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
त्यानुसार राज्यातील १३ लाखांपैकी ९ लाख १७ हजार नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. अवघ्या ४ दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात झाला जमा करण्यात आल्याने कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) April 28, 2021
निर्णयाचा फायदा राज्यातील नोंदीत कामगारांना मिळत असून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. गेल्या वर्षीही कोविड-१९या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत नोंदित बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली होती
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) April 28, 2021
तसेच नोंदीत बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्याची मंडळाकडून योजना राबविण्यात येत असून आतापर्यंत २ लक्ष ३ हजार कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सर्वच नोंदीत कामगारांची युद्धपातळीवर आरोग्य तपासणी करण्याचे योजिले आहे.
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) April 28, 2021